Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील

 विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील



चोपडी गटात परिवर्तनाची चाहूल; चेतनसिंह केदार सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांत विकास कामांचा ठसा उमटलेला असून शेती, पाणी, रस्ते व वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णायक काम झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीतून साध्य करायचा असेल तर महायुतीला साथ देणे काळाची गरज आहे, असे ठाम मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

      चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


      यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. विविध जलसिंचन योजना, कालवे व पाणी साठवण प्रकल्पांमुळे बागायती शेतीचे प्रमाण वाढले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. ग्रामीण रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीजपुरवठा व डीपीचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचणी येत नाहीत. हाच विकासाचा धागा जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तेथेही महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

      यावेळी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आल्यास पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. विकासाचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच महायुतीचे धोरण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रचार सभेला सरपंच बंडू बाबर, तानाजी बाबर, विश्वनाथ आप्पा बाबर, दादासाहेब बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला स्पष्ट पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला.


मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


 ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन जनतेसमोर - चेतनसिंह केदार सावंत 


सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीला पाठिंबा देणे काळाची गरज आहे. गावागावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न. सोडवण्याचे काम महायुतीच करू शकते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असून या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेआहे. ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या माध्यमातूनच गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.

     


  महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर, राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ.सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ उदनवाडी, चोपडी, पाचेगाव, बलवडी येथे प्रचार सभा घेण्यात आली. 

        यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, “महायुतीचे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे वेगाने मार्गी लावली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक सामान्य कुटुंबाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न महायुतीने पाहिले आहे, आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत,” अशी ठाम भूमिका चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी महायुतीच्या वतीने जनसंवादाच्या माध्यमातून मांडली.

       यावेळी पाचेगाव येथील सरपंच संगीता संजय भोसले, निवृत्ती मिसाळ गुरुजी, गोरख भोसले, संजय भोसले, तानाजी मिसाळ , आण्णासो पाटील, आबासो पाटील, दत्तात्रय मिसाळ, भारत मिसाळ, पोपट घुले, दुर्योधन घुले, भारत चव्हाण, तात्यासो मिसाळ, महेश गुरव, चोपडी येथील सरपंच श्रीमंत सरगर, उपसरपंच पॉपटशेठ यादव, दगडू बाबर, आर.एस.बाबर सर, सुरेश बाबर, अनिल चौगुले, मेजर अमोल बाबर, विनायक बाबर, बंडू मेखले, ॲड .शरद यादव, लक्ष्मण चौगुले, पोपट बाबर, विठ्ठल जरग, बाळासो बाबर, सचिन खळगे, सुरेश जाधव, बलवडी येथील मारुती शिंदे, महादेव शिंदे, दत्तात्रय निंबाळकर, साहेबराव शिंदे, विनायक शेंबडे, जैनुद्दीन शेख, जुबेर मुजावर, प्रशांत वलेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

सांगोला : कडलास जिल्हा परिषद गटात योगेश ( दादा ) खटकाळें ची जोरदार चर्चा; युवा नेतृत्वाकडे मतदारांचा ओढ*

 ♦️ *सांगोला : कडलास जिल्हा परिषद गटात योगेश ( दादा ) खटकाळें ची जोरदार चर्चा; युवा नेतृत्वाकडे मतदारांचा ओढ* 




सांगोला ( सुभाष येलपले ) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

विशेषतः कडलास जिल्हा परिषद गटात सध्या योगेश (दादा) खटकाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगत असून, सोशल मीडियापासून ते गावच्या चावडीपर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक सूर उमटताना दिसत आहेत.

लोकविकासाचा नवा चेहरा

कडलास गटात गेल्या काही काळापासून विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये संमिश्र भावना आहेत. अशा परिस्थितीत, योगेश खटकाळे यांनी सातत्याने जनसंपर्क वाढवून लोकांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे *. "लोकांचा विश्वास हाच आमचा विजय,"* असे म्हणत खटकाळे यांनी विकासाच्या रूपाने मतदारांना साद घातली आहे.

कडलास गटातील राजकीय समीकरणे


 *युवा शक्तीचा पाठिंबा* :


 खटकाळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि तडफदार नेतृत्व समोर येत असल्याने तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे.


 *गावगाड्याशी नाळ:*


 कडलास गटातील विविध गावांमध्ये त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम आणि थेट संवाद यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळत आहे.


 *परिवर्तनाची लाट:* 


स्थानिक पातळीवर *"बदल हवा"* अशी भावना असलेल्या मतदारांचा कल खटकाळे यांच्याकडे झुकताना दिसत आहे.

निवडणुकीची उत्सुकता वाढली

सांगोल्याच्या राजकारणात नेहमीच चुरस पाहायला मिळते. या वेळेस कडलास गटातून योगेश खटकाळे मैदानात उतरले आहेत. चर्चेनुसार प्रस्थापित नेत्यांच्या गटात ही हालचाली वाढल्या आहेत.

महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने  स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे.

विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या व�



कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासूद गावातून मताधिक्य देवू : उपसरपंच अनिल केदार.

 कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासूद गावातून मताधिक्य देवू : उपसरपंच अनिल केदार.

*श्री हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ ,



सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वासुद गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल केदार म्हणाले, वासुद गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करु.

यावेळी सुनील भोरे सर म्हणाले, वासूद गावातून मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना कायम  बहुमत दिले आहे. त्याप्रमाणे कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोला तालुक्याला  निधी कमी पडणार नाही. आपले कोणतेही काम भविष्यात आडणार नाही. त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वासूद गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देवू असा निर्धार व्यक्त केला.





यावेळी मा. जि. प .सदस्य अशोकभाऊ शिंदे म्हणाले 2012 साली मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभारलो होतो. त्यावेळी द वासूद गावाने मताधिक्य दिले होते. यावेळी वासुद गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, वासूद येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला असल्याबद्दल आभार व्यक्त करीत कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो. मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.यावेळी माजी सरपंच अरुण केदार यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी उमेदवार शोभाताई खटकाळे, उमेदवार राणीताई पाटील, उद्योगपती सौदागर केदार,  विष्णुपंत केदार, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उपसरपंच बंडू केदार, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सागरदादा पाटील, संजय केदार,चेअरमन अनिल खटकाळे, धर्मराज केदार, जगन्नाथ केदार ,भागवत शिंदे, महादेव शिंदे, उपसरपंच रजाक मुलाणी, अनिकेत सुरवसे ,नितीन चंदनशिवे, दिगंबर शिंदे, चेतन खटकाळे, विकास केदार, साहिल शिंदे ,विशाल खटके ,रोहन शिंदे ,यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

 जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

वाढेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ; वाढेगावच्या कॉर्नर सभेत जनसागर उसळला



सांगोला प्रतिनिधी:

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक प्रचार शुभारंभाने संपूर्ण जवळा गटात निवडणुकीचे वातावरण अक्षरशः तापले असून महायुतीच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.

या निमित्ताने जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वाढेगाव येथे जोरदार कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे उत्साहात पार पडला. या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

या वेळी जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त वाढेगाव येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिला.


कॉर्नर सभेत उमेदवारांनी विकास, जनतेच्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका मांडली. “जवळा गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरू,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सभेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून रस्ते, चौक आणि गल्लीगल्लीतून कार्यकर्त्यांची व समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती.

सभेत महायुतीच्या सर्व प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जवळा गटाचा विकास हाच आमचा अजेंडा असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरू,” असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

घड्याळाच्या चिन्हाचा जयघोष, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता, जवळा गटात महायुतीने निवडणूक लढाईत आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून मिळाले. प्रचाराचा हा भव्य शुभारंभ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

*जि. प.व पं.स.सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी दुसरे प्रशिक्षण हँडसॉन (प्रात्यक्षिक) संपन्न*

 

 *जि. प.व पं.स.सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी दुसरे प्रशिक्षण हँडसॉन (प्रात्यक्षिक) संपन्न*



              सांगोला येथे आज दिनांक 31/01/2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह व विद्यामंदिर प्रशाला ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सकाळी 10:00  ते 5:00 वाजेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व कायद्या च्या चौकटीत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सूचना दिल्या आहेत

        तसेच यावेळी सोमनाथ साळुंखे निवासी नायब तहसीलदार, समाधान वाघमोडे सर, यांनी ईव्हीएम बाबत मार्गदर्शन केले सिलिंग प्रोसेस दाखवण्यात आली आहे मॉक पोल, मतदार ओळख प्रक्रिया याबाबत माहिती दिली प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, व बुथवरील परिचर असे एकूण  1470 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी कैलास मडके, शशिकांत सुतकर, नितीन गवळी, नागेश हवेली, सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव झोनल अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे.    

     





       विद्यामंदिर प्रशाला सांगोला या ठिकाणी हँडसॉन (प्रात्यक्षिक) दाखवण्यासाठी 14 खोल्यांमध्ये नोडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव व त्यांच्या टीम द्वारे प्रत्यक्ष व व्हिडिओ दाखवून घेण्यात आले आहे त्यावेळी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, एक दोन तीन, सहाय्यक मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांना माहिती देण्यासाठी झोनल अधिकारी उपस्थित होते

            निवडणूक प्रशिक्षण क्लासरूम व हँडसॉन प्रात्यक्षिक पूर्ण झाल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे त्यामुळे आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी व्यक्त केला आहे


कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठे मताधिक्य देणार: वाटंबरे ग्रामस्थांचा निर्धार

 कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठे मताधिक्य देणार: वाटंबरे ग्रामस्थांचा निर्धार 



*वाटंबरे गावचे जागृत देवस्थान खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून कडलास जिल्हा परिषद गटातील उमेदवार , कडलास व अजनाळे गणाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ 


सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाटंबरे गावातील जागृत देवस्थान खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून वाटंबरे गावात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मधुकर पवार , विकास पवार ,दत्तात्रय पवार, यांनी मनोगतात सांगितले की, वाटंबरे गावातून मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना कायम बहुमत दिले आहे. त्याप्रमाणे या कडलास गटाच्या व गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला. केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोला तालुक्याला निधी कमी पडणार नाही. उमेदवार शोभाताई खटकाळे व उमेदवार राणीताई पाटील या दोन उमेदवारांची समाजाशी एकरूपता असल्याने आपले कोणतेही काम भविष्यात आडणार नाही. त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा ठाम निर्धार व मनोदय वाटंबरे गावातील ग्रामस्थांनी प्रचार बैठकीदरम्यान व्यक्त केला.



यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका राणीताई माने म्हणाल्या, वाटंबरे गावातून बापूंना लीड दिले जाते. त्याप्रमाणे कडलास गटातील उमेदवारांनाही मोठे लीड द्यावे. या गावात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठी विकास कामे केली आहेत. बापूंच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे विकास कामाला आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना तालुक्यात चांगले वातावरण असून उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे.भविष्यात बापूंना मोठी साथ मिळेल व तालुक्याच्या विकासाला अधिक गती येईल.

यावेळी मा. जि. प .सदस्य अशोकभाऊ शिंदे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, म्हणाले, वाटंबरे गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून निवडणुकीनंतर आम्ही त्या सोडवण्यासाठी पुन्हा तुमच्या गावात येऊ. 

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, वाटंबरे गावामध्ये खंडोबा मंदिर येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला. कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे धनुष्यबाण चिन्ह असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करतो. मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.गेल्या वर्षभरात तालुक्यातील विकास कामाची स्थिती अनुभवली असेल एकही विकासाभिमुख काम झाले नाही. याचाही मतदारांनी वेळीच विचार केला पाहिजे. 


या कार्यक्रमासाठी अकोला गावच्या सरपंच धनश्री गव्हाणे, चेअरमन लतिका मोटे, नगरसेविका छायाताई मेटकरी, नगरसेविका गोदाबाई बनसोडे, नगरसेविका सीमा सरगर, उद्योगपती सुभाष पवार ,शिवसेना युवानेते सागरदादा पाटील, चेअरमन अनिल खटकाळे, उद्योगपती बाळासाहेब झपके, सुबरावबापू पवार ,नानाबापू पवार, खंडू पवार ,मधुकर पवार, प्रतीक पवार, भारत पवार ,असिफ मुलाणी धीरज पवार, पंडित पवार ,आप्पासाहेब शिंदे, सुखदेव पवार ,प्रवीण पवार, संभाजी पवार, रंगा गेजगे, तानाजी पवार, विनायक पवार, सौदागर भगरे ,संजय पवार, भाग्यवान पवार, संजय कुलकर्णी, राजू शितोळे ,दिलीप पवार, पांडुरंग पवार, साहिल शिंदे, दीपक शिंदे, वैभव गव्हाणे, प्रमोद सावंत ,निरंजन खटकाळे, आयुष खटकाळे, अमोल खटकाळे, शुभम पवार, निलेश खटकाळे, चेतन खटकाळे, शामराव गेजगे, तसेच जयश्री पवार, राधिका पवार, कविता पवार, शोभाताई पवार, शितल जाधव, शारदा माळी, प्रणाली शिंदे, शकुंतला आसबे, अनिता शिंदे ,वनिता केदार, देवयानी खटकाळे, रूपाली गुरव, अश्विनी गुरव, अंजना देशमुख, अक्काताई खटकाळे, जयश्री शिंदे ,सुमन पवार , शोभा खटकाळे चैत्राली शिंदे, रूपाली भोरे ,शारदा खटकाळे, राजाबाई पवार, यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव

 विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव




विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर चोपडी गटात महायुतीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद 



सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असून सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे काम महायुतीने प्रत्यक्ष कृतीतून केले आहे. पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसह विविध विकासकामांच्या जोरावर चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचाच झेंडा फडकेल. “सांगोल्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासावर, केलेल्या कामांवर आणि विकासाच्या भक्कम पायावरच चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केला.

       महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना शिवसेना नेते पोपटशेठ यादव म्हणाले की, सांगोल्याचे पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी प्रश्न मार्गी लागले असून, गावोगावी जलजीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना आणि विकासकामांना गती देण्यात आली आहे. चोपडी गटातील अंतर्गत रस्ते, शेतरस्ते व दळणवळणाच्या सोयीसाठी कोट्यवधींची कामे मार्गी लावण्यात आली. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सिमेंट रस्ते, पुलांची कामे आणि दुरुस्ती प्रकल्प राबविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज लाईन दुरुस्ती आणि शेतीसाठी वीजपुरवठा या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.

        आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. केवळ आश्वासनांचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावरच महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात महायुतीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित ही लढत असून चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असल्याची भावना असल्याचे मत शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केले.


वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार

 वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार 



सांगोला प्रतिनिधी: 

वाढेगाव येथे आज झालेल्या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड आणि उस्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. रस्ते, चौक आणि परिसरात घोषणाबाजी व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा रंगली.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली. “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश देत समर्थकांनी एकजूट दाखवली. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना मा. अतुल (मालक) पवार यांनी विरोधकांवर टीका करत विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले, “दादांनी आयुष्य जनतेसाठी दिलं. वाढेगावला आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष काम हवं आहे. घड्याळ चिन्ह हे विश्वास आणि सातत्यपूर्ण कामाचं प्रतीक आहे. जनतेचा कौल काम करणाऱ्यांच्या बाजूनेच लागेल.”

तसेच श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात विकासाचा मुद्दा पुढे करत समर्थकांना आवाहन केले. “वाढेगावच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जनतेने अनुभवातून योग्य-अयोग्य ओळखलं आहे. घड्याळ चिन्हावर ठसा उमटवून विकासाच्या बाजूने उभे राहा,” असे ते म्हणाले.



कार्यक्रमात मा.अतुल (मालक) पवार , शिवसेना शिंदे गट युवा नेते मा. सागर पाटील, नूतन नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने. नगरसेवक मा. काशिलिंग गावडे नगरसेवक मा.माऊली तेली, भाजपा उमेदवार सो भारती लालासाहेब देशमुख, शिवसेना उमेदवार सौ. राणी गजानन उबाळे

स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार शुभारंभानंतर गावात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.


शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद

 कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद



*कडलास जिल्हा परिषद गटातील चिणके, अजनाळे, कमलापूर, वझरे य.मंगेवाडी येथे प्रचारानिमित्त कुटुंबांना दिल्या भेटी.

सांगोला/ प्रतिनिधी:कडलास जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील ,अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार शितल सचिन भंडगे निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी ,मान्यवर ,कार्यकर्त्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.       


       ‌अजनाळे गणातील‌ अजनाळे, कमलापूर , य.मंगेवाडी, चिणके, वझरे या गावांमध्ये प्रचार करण्यात आला व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.


जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

 जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली



लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे — अतुल (मालक) पवार यांची कार्यपद्धती चर्चेत

सांगोला प्रतिनिधी:

आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे, अडचणी आणि प्रश्न घेऊन पुढाऱ्यांच्या दारात तासन्‌तास थांबावे लागत होते. “उद्या या, परवा या” म्हणत लोकांची फिरवाफिरवी करणारी राजकीय संस्कृती अनेक वर्षे चालू होती. मात्र अतुल (मालक) पवार यांनी ही जुनी पद्धत मोडीत काढत लोकांकडे थेट जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची नवी कार्यशैली सुरू केली आहे.

आजवरची राजकीय परंपरा काय होती? — जनतेने नेत्यांच्या दारात उभं राहायचं, विनवण्या करायच्या, आणि शेवटी “पाहू पुढे” असं उत्तर घेऊन परत जायचं.

पण आता चित्र उलटं झालंय. अतुल (मालक) पवार यांनी नेत्यांनाच लोकांच्या दारात जाऊन कामे व अडचणी विचारण्याची सवय लावली आहे.


गावागावात भेटी, प्रत्यक्ष संवाद आणि त्वरित निर्णय — या त्रिसूत्रीवर काम करत अतुल पवार यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, अनेक वर्षे सत्तेत राहूनही केवळ आश्वासनांची फुगे उडवणाऱ्या विरोधकांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुका आल्या कीच जनतेची आठवण काढणारे आणि उरलेल्या काळात गायब होणारे काही नेते आता अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र “काम केलेल्यालाच मान” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेत असल्याचे दिसून येते.

लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ टीका आणि अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला लोक प्राधान्य देत आहेत. “कार्यालयात बसून राजकारण” करणाऱ्यांना आता “मैदानात उतरून काम” करणाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.



 


सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता हवी : माजी आम.शहाजीबापू पाटील

 सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता हवी : माजी आम.शहाजीबापू पाटील 



माजी आम. शहाजीबापू पाटील , कडलास गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ 


*कडलास येथील लेंडवेमळा, गायकवाड वस्ती, करलवस्ती माने- महांकाळवस्ती, येथे गृहभेटी , प्रचार संपन्न


सांगोला/ प्रतिनिधी: पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपणास सत्ता हवी आहे. सत्तेबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. विधानसभा निवडणुकीपासून दीपकआबांनी तीन वेळा विश्वास गमावला. यापूर्वी पंचायत समितीत स्व.आम. गणपतराव देशमुख व माजी आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांना विचारल्याशिवाय जनतेची कामे होत नव्हती. जनतेच्या कामासाठीच आपल्याला सत्तेत सामील व्हायचे आहे. कडलास गावाला मी माझं गाव मानतो. तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे खूप मोठी दूरदृष्टी असून माझी स्वप्ने वेगळी आहेत. सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 1995 व 2019 ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यामुळे मी जनतेचे उपकार विसरणार नाही .नगरपालिकेत आपली सत्ता आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ही आपणास सत्ता खेचून आणायची आहे. कडलास गावच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे अभिवचन माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी कडलास येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दिले. 

कडलास येथील खंडोबा मंदिर, सिद्धनाथ मंदिर व ग्रामदैवतांना नारळ फोडून माजी आम. शाहाजीबापू पाटील, महायुतीच्या शिवसेनेच्या कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे , गणाच्या उमेदवार राणीताई पाटील  व मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड म्हणाले, महायुती सरकारमुळे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळे सांगोला तालुक्याचे परिवर्तन झाले. सांगोला तालुक्याच्या शेतीचा व पाण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहाजीबापू पाटील व आमच्या घराण्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कडलास गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ असा विश्वास व्यक्त केला 

डॉ. विजय बाबर म्हणाले ,आमदार शहाजीबापू पाटील यांनी कडलास गावचा दुष्काळ हाटवला . चंद्र सूर्य असेपर्यंत तालुक्याला कायमस्वरूपी हक्काचं पाणी मिळणार आहे. महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू असा शब्द दिला. 

यावेळी सुनीलनाना पवार म्हणाले, राज्यात महायुतीचे विकासाभिमुख सरकार आहे. बापूंनी कडलास गावात खूप विकासकामे केली आहेत. खंडोबा मंदिराचा समावेश ब वर्गात करावा अशी मागणी करीत गेल्या वर्षभरात तालुक्यात कोणतीही ठोस विकास कामे झाली नसल्याची खंत व्यक्त केली. यावर्षी दुष्काळाची चिन्ह आहेत. त्यामुळे पाणी ‌प्रश्नाबाबत सर्वांनाच दक्ष राहणे गरजेचे आहे. कडलास येथील लेंडवे मळा गायकवाडवस्ती, करलवस्ती, माने महांकाळवाडी येथे उमेदवारांनी कुटुंबांना भेटी देत प्रचार केला.

यावेळी भाजप -शिवसेना आर .पी. आय. महायुतीतील नेते ,भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड, सुनीलनाना पवार ,माजी जि. प. सदस्य अशोक शिंदे, उद्योगपती युवानेते योगेशदादा खटकाळे, सागरदादा पाटील, माजी सरपंच दिगंबर भजनावळे, चेअरमन अनिल खटकाळे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती प्रशांत तेली,ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे, दत्ता गायकवाड, दिगंबर गायकवाड ,तानाजी शिंदे,योगेश गायकवाड, उद्धव गायकवाड, महादेव गायकवाड, शिवाजी ठोकळे ,विजय गायकवाड, गणेश लवटे, भाऊसाहेब खटकाळे, पांडुरंग आसबे, प्रभाकर भगरे योगेश गायकवाड,सुदर्शन लिगाडे, वैभव गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड ,प्रणाली शिंदे, वनिता केदार, वर्षा पाटील ,आदी मान्यवर, पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू-भगिनी प्रचारात सहभागी होते. मान्यवरांनी प्रत्येक कुटुंबाची भेट घेत महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.




चौकट:  सामाजिक बांधिलकीत आमच्या कुटुंबाचा नेहमी सहभाग असतो. बापू आमदार नसताना आजही विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कडलास गावातील मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना  बहुमताने विजयी करावे : युवानेते योगेशदादा खटकाळे


हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”

 “हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”


लाडकी बहीण ते स्वयंरोजगारापर्यंत… महिलांच्या विश्वासातून चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित



सांगोला प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटातील भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रचारार्थ सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सुजाताताई केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली चोपडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना महिलांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


     यावेळी सौ. सुजाताताई केदार सावंत यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अत्यंत आपुलकीने चर्चा केली. महिलांना सक्षम केल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही, हा महायुतीचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थसहाय्य, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुजाताताई केदार सावंत यांनी दिले. यासोबतच गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य, तसेच महिलांसाठीच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


       या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे पाहिले जात असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झालेला उत्साह, सहभाग आणि विजयी निर्धार पाहता, चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीच्या प्रचाराला महिलांची भक्कम साथ मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.




गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे

 कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे



*कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील यांच्या प्रचारार्थ कडलास येथे मतदारांच्या गृहभेटीला उस्फूर्त प्रतिसाद 


सांगोला/ प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कडलास जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांचे मूलभूत प्रश्न रस्ते ,पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असा विश्वास कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांनी ग्रामस्थांना दिला आहे . निवडणुकीच्या दृष्टीने कडलास गटातील कडलास येथे प्रचार करीत असताना घरोघरी जाऊन या गावातील महिला व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध राहू असा ठाम विश्वास येथील मतदार जनतेला देण्यात आला.  कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील याही या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या. कडलास येथील लिगाडे गल्लीतून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास व प्रचारास सुरुवात करण्यात आली. 


मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे दोन्ही उमेदवार प्रचारात आघाडीवर असून हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रचारप्रसंगी अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड, अर्चना गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, प्रणाली शिंदे, सोनाली आसबे, वनिता केदार ,वर्षा पाटील, शोभा लिगाडे, सुमन जाधव या महिला भगिनींचा समावेश होता. तर मान्यवरामध्ये सुनीलनाना पवार, शहाजी चव्हाण, डॉ. विजय बाबर ,मुकुंद पाटील, नितीन गायकवाड, सयाजी गायकवाड, सुनील महांकाळ, सुशांत जाधव, सिद्धेश्वर ढेबे, वैभव लेंडवे, दत्ता गायकवाड, महेश गुरव हे सहभागी झाले होते.



बुधवार, २८ जानेवारी, २०२६

राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं - चेतनसिंह केदार सावंत

 राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं - चेतनसिंह केदार सावंत 



सांगोला (प्रतिनिधी): अजितदादा पवार हे राज्याचे अभ्यासू आणि स्पष्टवक्ते प्रशासनावर फकड असलेलं नेतृत्व होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपले असून महाराष्ट्राचे मोठं नुकसान झालं आहे. राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.

      राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळावर बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस असून राज्याची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजितदादा अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व होतं. ज्या वेळी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असताना अशा काळात त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनिय मनाला चटका लावणारं आहे. “मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड असलेला नेता होता. बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारा नेता राज्याने गमावला अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सहवेदना व्यक्त केल्या.


सोमवार, २६ जानेवारी, २०२६

सिमासुरक्षाबल दलातील दिग्विजय भगत यांचा वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

 सिमासुरक्षाबल दलातील दिग्विजय भगत यांचा वाटंबरे  ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.



वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे गावचे सुपुत्र व सुरक्षाबल दलात नूतन भरती झालेले  दिग्विजय भगत यांचा वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देऊन त्यांचा व  कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. 

सीमा सुरक्षा बलदलात भरती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण  लातूर येथील चाकुर या  ठिकाणी झाले तसेच ते देशसेवा बजावण्यासाठी त्रिपुरा या ठिकाणी जाणार आहेत  .    गावातील तरुण मुलांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत .

या सन्मान सोहळ्यात ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी दिग्विजय भगत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 दिग्विजय भगत यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच गावातील तरुण मुलांनी जास्तीत जास्त सुरक्षा दल बलात भरतीसाठी प्रयत्न करण्याचे  आव्हान केले.




प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट .

 प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट .



श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या शाळेच्या  सन 1982 सालच्या इ.दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक भान आणि शैक्षणिक जाण ठेवत आपण शिकून गेलेल्या शाळेतील हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थिनींना स्वखर्चाने नवीन सायकलीं वाटपाचा कार्यक्रम तत्कालीन मुख्याध्यापक श्री शामराव शिंदे सर आणि सध्याचे मुख्याध्यापक श्री राजाराम वलेकर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी 1982 च्या दहावी वर्गाचे श्री चांडोले बी.एस.,जवंजाळ बी.एन., पवार पी.पी.,सौ मंदाकिनी स्वामी, श्रीमती शकुंतला स्वामी, श्रीमती नंदा भजनावळे, श्री पाटील आर.एम., श्री वलेकर बाजीराव, श्री विजय गाडे सर, श्री जीवन कांबळे सर, शिवाजी मिसाळ, भागवत रुपनर,राहूल मोरे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक आवर्जून उपस्थित होते..


   शाळेने दिलेल्या ज्ञान-संस्कारांच्या उपकाराची थोडीशी उतराई आणि ग्रामीण भागातील मुलींच्या मनात शिक्षणाची उमेद निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 15ऑगस्ट 2026रोजी आणखी सायकलींची भेट देणार असल्याचे सांगितले.तसेच आजपर्यंत या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक स्नेहमेळावा घेण्यात यावा असा विचार शामराव शिंदे सर यांनी बोलून दाखवला.या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक श्री राजाराम वलेकर सर यांनी दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले....

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर: माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर: माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील 


रविवार, २५ जानेवारी, २०२६

योगेश दादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण.

 योगेश दादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या रस्त्याचे काम पूर्ण.




कडलास येथील जिल्हा प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शाळकरी मुले व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या कडलास येथील युवकांनी योगेश दादा खटकाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

योगेश दादा खटकाळे यांच्या आदेशानुसार रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे शाळेत ये–जा करणाऱ्या लहान मुलांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांनी या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांवर त्वरित उपाय करण्याची जी परंपरा आहे, त्याच परंपरेनुसार हे काम पूर्ण करून देण्यात आले, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

तसेच शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांना कडलास परिसरातून चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जनतेच्या प्रश्नांवर फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व हीच महायुतीची खरी ताकद असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.


रस्ते-पाणी-वीज ते रोजगारापर्यंत ठोस आराखडा; चोपडी गटात चेतनसिंह सावंत यांची विकासाची हमी

 रस्ते-पाणी-वीज ते रोजगारापर्यंत ठोस आराखडा; चोपडी गटात चेतनसिंह सावंत यांची विकासाची हमी



महायुतीची ताकद, जनतेचा विश्वास; चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत यांचा निर्धार


सांगोला (प्रतिनिधी): भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीकडून चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत हे निवडणूक रिंगणात उतरले असून, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण ते रोजगार या सर्व मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि कृतीशील विकास आराखडा त्यांनी जनतेसमोर मांडला आहे. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. चोपडी गटातील "प्रत्येक गावाचा विकास, प्रत्येक नागरिकाला न्याय” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.


       कारंडेवाडी (बुद्धेहाळ), कारंडेवाडी ( उदनवाडी), सोमेवाडी, निजामपूर, हणमंतगाव, लोणविरे, नाझरे गावांमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या, चोपडी गटातील विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना पक्के रस्ते, नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा आणि अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावून नवीन कामांना गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


       ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि अंगणवाड्यांच्या सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा दुरुस्ती, मूलभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगार निर्मिती आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.


      बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना व अन्य घरकुल योजनांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सावंत यांनी सांगितले. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास निधी आणि योजनांचा थेट लाभ चोपडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला. “मी फक्त निवडणुकीपुरता नेता नाही, तर पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून काम करणारा प्रतिनिधी असेन. सर्वसामान्यांचा आवाज जिल्हा परिषदेत ठामपणे मांडेन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महायुतीची ताकद आणि जनतेचा वाढता विश्वास लक्षात घेता, चोपडी जिल्हा परिषद गटात चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart