Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

गुरुवार, ९ जुलै, २०२६

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरामाजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे मात्र, सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. कृष्णा कोयना भीमा पंचगंगा आणि नीरा नदीच्या पात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तत्काळ टेंभू उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्याला सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवर होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे विहिरी, तलाव आणि कुपनलिका तसेच अन्य जलस्रोतांनी तळ गाठल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कृष्णा, कोयना भीमा निरा पंचगंगा तसेच अन्य नद्यांच्या खोऱ्यात व घाटमाथ्यावर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. या नदीकाठील लोकांचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या सांगोला तालुक्यातील माणगंगा, कोरडा, आफ्रुका आणि बेलवण यासारख्या नद्या मात्र ऐन पावसाळ्यात कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे कृष्णा, कोयना,भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीतून वाहून जाणारे पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माणगंगा नदीत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत आणि नीरा नदीचे पाणी सांगोला शाखा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास आणि या पाण्यातून सांगोला तालुक्यातील छोट्या मोठ्या तलावांना पाणी सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त अशा दोन्ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणून राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ टेंभू योजना म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. 

चौकट ; 

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ; मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कृष्णा, कोयना, निरा पंचगंगा या नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीच्या काठावरील लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना व नीर उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील


मंगळवार, ७ जुलै, २०२६

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे खंडोबा देवस्थानला एक्वागार्ड भेट

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान चरणी एक्वागार्ड भेट. 

सांगोला/ प्रतिनिधी 

 नांगोळे (कवठेमंकाळ) येथील संजय रुद्रप्पा वाले या कुटुंबाच्या वतीने त्यांचा मुलगा कै . सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे (सांगोला) येथील जागृत खंडोबा देवस्थान या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एक्वागार्ड देण्यात आले.  खंडोबा देवस्थानचे पुजारी तसेच वाटंबरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  खंडोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

सोमवार, ६ जुलै, २०२६

पांडुरंग गायकवाड यांचे निधन

पांडुरंग गायकवाड यांचे निधन 


पंढरपूर /प्रतिनिधी 
  

बोहाळी (ता.पंढरपूर ) येथील पांडुरंग दत्तू गायकवाड यांचे वयाच्या  ८५ वर्षी  य
 हृदयविकाराच्या झटक्याने दि. ६ जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार सुरेश गायकवाड यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने डोहाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवार, ५ जुलै, २०२६

देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत

 ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत



सांगोला :- महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री तथा सोलापुर जिल्हा पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक श्री. जयकुमारजी गोरे साहेब व माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, आमचे मार्गदर्शक श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ राबविण्यात येत असून, या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथून करण्यात आला.


सभापती चेतनसिंह केदार सावंत स्वतः या अभियानाचे नेतृत्व करत असून, प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सखोल आढावा घेणार आहेत. अभियानातील त्रुटींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे.


नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान माता व बाल आरोग्य योजना, आयुष्मान आरोग्य मंदिराच्या १३ सर्वसमावेशक सेवा, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सार्वत्रिक लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किशोर आरोग्य, कुटुंब नियोजन, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, डेंग्यू व फायलरिया नियंत्रण, असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य सेवा, आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, रोग सर्वेक्षण (IDSP), मोफत औषध वितरण, प्रयोगशाळा सेवा, विविध तपासण्या तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, जनआरोग्य समिती (JAS) सदस्य, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या सर्व आरोग्य योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. सेवा वितरणातील त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.


या अभियानामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होऊन सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


या बैठकीस सांगोला पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते, विस्तार अधिकारी जयंत टकले, सुरेश चौगुले, भाऊ पाटील, सुरेश आदाटे, विजयकुमार जावीर, रमेश पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, रियाज काझी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 



चौकट 

देवाभाऊ जनआरोग्य अभियान ” हा केवळ आढावा घेण्याचा उपक्रम नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न आहे. एकही पात्र नागरिक शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सभापती चेतनसिंह केदार सावंत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

शनिवार, ४ जुलै, २०२६

सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*

 *खिलारवाडी-हलदहिवडी 4.5 किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*  


*सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*



*सांगोला* : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी दरम्यानच्या 4.50 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.


सुमारे *7 कोटी रुपये* खर्चाच्या या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विशेष आग्रहावरून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


*6 गावांना थेट फायदा*

या रस्त्यामुळे फक्त खिलारवाडी आणि हलदहिवडीच नव्हे, तर *गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी* या एकूण सहा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


रस्ता झाल्याने शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे. तसेच या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होणारी *दूध आणि ऊसाची वाहतूक* देखील आता कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकणार आहे.


*शहाजी बापूंचे आश्वासन*

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले,  

_"खिलारवाडी आणि माझे जीवनाशी निगडीत जवळचे संबंध आहेत. गेली अनेक वर्षे राजकारण ते समाजकारणाच्या क्षेत्रात येथील लोकांनी मला मोठ्या ताकतीने पाठिंबा दिला आहे. मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायमचा आग्रही राहीन. राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी लवकरात लवकर निधी आणून सर्व कामे पूर्णत्वास नेईन."_


याचबरोबर त्यांनी या भागातील *पाण्याच्या कॅनॉलचा फाटा लवकरच कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे* आश्वासनही दिले.


*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*

या भव्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य *दादासाहेब लवटे*, पंचायत समिती सदस्य *बाळासाहेब बंडगर*, *उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील, ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले* यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.


झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल ; दिपकआबा साळुंखे पाटील

 झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल ; दिपकआबा साळुंखे पाटील 



लोकनेते रामशेठ ठाकूर व दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याहस्ते नवी मुंबई येथे झेनिथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन


सांगोला ; तालुका प्रतिनिधी


मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात बांधकाम क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केलेल्या "झेनिथ कन्स्ट्रक्शन" ही कंपनी आगामी काळात मुंबई आणि नवी मुंबई परिसराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. झेनीथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, कंपनीने दर्जेदार निवासी, व्यावसायिक तसेच पायाभूत बांधकाम प्रकल्पांची यशस्वी उभारणी करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आधुनिक नियोजन, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे कंपनीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोजगारनिर्मितीला चालना देत सांगोला तालुक्यातील शेकडो ठेकेदार आणि तरुणांच्या हाताला या कंपनीने काम दिले आहे. एकंदरीत मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणारी ही संस्था भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


उद्घाटन समारंभास माजी महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतमशेठ म्हात्रे , रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, नगरसेविका प्रतिभा भोईर, कार्यक्रमाचे नियोजक ज्येष्ठ नेते गणेशदादा कडू आदी मान्यवरांसह झेनिथ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा महेश पाटील, जितेश पाटील, तेजस पाटील, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संपूर्ण परिवाराला नूतन कार्यालयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून कंपनीने अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख प्रकल्प साकारत विकासाला गती द्यावी, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात आणि बांधकाम क्षेत्रात यशाची नवी उंची गाठावी, अशा सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.


चौकट 


लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल दिपकआबांचे गौरवोद्गार 


मुंबई आणि नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. ते खऱ्या अर्थाने राज्याचे भीष्मपितामह आहेत. उद्योग व्यवसाय आणि राजकारणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात म्हणजे परीस आहे असे गौरवोद्गार काढत झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात लागला आहे आगामी काळात या व्यवसायाचे नक्कीच सोने होणार असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.



फोटो ;

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम


 अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम



सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत सांगोला शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच निष्काळजी वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे आकर्षक फलक उभारण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त दुचाकी वाहन प्रदर्शित करून अपघाताच्या भीषण परिणामांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येत आहे.

"Helmet is costly, But Brain is priceless!" या प्रभावी संदेशाद्वारे दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात असून, "अति घाई संकटात नेई" या संदेशातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांबाबत जागरूकता निर्माण करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.

सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करून स्वतःसह इतरांच्याही जीविताचे रक्षण करावे, असे आवाहन सांगोला पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.






Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart