Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”*

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला



महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास  सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते.


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.



यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


याप्रसंगी  आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी  मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, ३० जुलै, २०२६

कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*

 *कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*



*महास्वामींच्या मठात शिवपाठ, पारायण, भजन, किर्तन, गुरु दीक्षा, रक्तदान, महाप्रसाद वाटप करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..*

नाझरे प्रतिनिधी 

   !!गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोचि सच्चिदानंद, गुरुचे करा भजन, गुरु करी दुःख निवारण, गुरु माझा योगीराणा, गुरुपायी श्रद्धा हीच खरी गुरुदक्षिणा..!!

    हेच विचार मनात घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे ता. सांगोला येथील महास्वामींच्या मठात लाखो भाविकांनी नतमस्तक होऊन गुरु शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती गुरुपौर्णिमा दिवशी महास्वामीच्या मठात दिसून आली. गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, कोळेकर महास्वामी की जय, हर हर महादेव या जयघोषाने कोळेनगरी दुमदुमली व कोळेगावातून भव्य रथात मिरवणूक महास्वामींची काढून, जयघोष करून गुरुप्रती वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले, कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व कोळेकर महास्वामीजी 31सावे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. 

    भारतीय संस्कृतीत गुरूला फार महत्त्व आहे, गुरु केवळ ग्रंथ शिकवणारा नसून योग्य मार्ग दाखवणारा आहे व संसार रुपी सागर पार करायचा असेल तर गुरुची गरज आहे व गुरुचरणाशी मस्तक टेकवणे गरजेचे आहे व प्रत्येकाने गुरुची सेवा करा यश प्राप्ती होईल असे कोळेकर महास्वामींनी आशीर्वाचनात सांगितले व सात दिवस सर्वांनी मिळून कार्यक्रम सुंदर केला तसेच प्रत्येकाने घरचे काम समजून मनातील सेवा केली व त्यामुळे कुदळे कंपनी, कोळे ग्रामस्थ, वीरशैव तरुण मंडळ, गुरु गादी मठ संस्थान पदाधिकारी, महिला, युवक, आबाल वृद्ध या सर्वांना गुरुचा आशीर्वाद आहे असेही महास्वामिनी यावेळी सांगितले. यावेळी असंख्य सेवेकरी यांचा गुरू गादी तर्फे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत भजनी मंडळ, ढोल ताशा, वाजंत्री, गजी ढोल इत्यादीचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.

*‌.. शेकडो भक्तांचे रक्तदान..*

  गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोळेकर महास्वामींच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पानंद रस्ते अध्यक्ष सचिन देशमुख, मा. उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, शिंदे मेजर, अमोल कोरे, दुर्वास शेटे व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी 175 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर यांनी सांगितले. 

*.. नेटके नियोजन..*

  गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी नेटके नियोजन केले होते. यावेळी महाप्रसाद देणारे गुरुभक्त अर्जुन खरसुडे व परिवार तासगाव तसेच देणगीदार महादेव पैलवान, माया पैलवान व सौ मालन शिवपुजे यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. 

*.. लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..*

सकाळी अकरा वाजल्यापासून रात्र बारा वाजेपर्यंत अन्नछत्र मंडळात लाखो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ‌ यावेळी सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले.

बुधवार, २९ जुलै, २०२६

वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी. धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.

 वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी.

धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.



वाटंबरे (प्रतिनिधी):

रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंट हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसविण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

या कट पॉईंटवरून अकोला, वासूद, कडलास तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, कट पॉईंटच्या उत्तरेकडील बाजूस तीव्र वळण आणि उतार असल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग अधिक असतो. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक व वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या कट पॉईंटवर तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. 


फोटो:  वाटंबरे येथील अपघातप्रवण कट पॉईंट , उत्तरेकडून तीव्र गतीने येताना चार चाकी वाहन दिसत आहे .

सोमवार, २७ जुलै, २०२६

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन.

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील वाॅटर फिल्टर खरेदी विक्रीचे उद्योजक सत्यप्रकाश पवार यांचे सोमवार दि. २७ जुलै रोजी अपघाती निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय ३५ वर्ष होते. त्यांच्या अपघाती निधनाने वाटंबरे गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीत होणार आहे याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

रविवार, २६ जुलै, २०२६

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन.

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
वाटंबरे येथील जनार्दन पांडुरंग पवार यांचे शनिवार दि. 25 जुलै रोजी वयाच्या ८१ वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,नातवंडे ,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीमध्ये होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार

 कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार 



चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 


राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. 

सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले. 


चौकट ; 


१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील 


सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात. 


 आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

गुरुवार, २३ जुलै, २०२६

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

 माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

 संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश





पंढरपूर (दि.22) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.



माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली , टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा ... आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. 


यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वागत केले. 


                                                     

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart