Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास

 हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास 



बलवडी येथे हुतात्मा महादेव शिंदे स्मारकाचे अनावरण संपन्न


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

       

बलवडी गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व शौर्याचा आहे कारण 59 वर्षानंतर सुद्धा गावकऱ्यांच्या मनात वीर सुपुत्र हुतात्मा महादेव शिंदे व वीर माता पद्मिनी आई शिंदे यांच्या बद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी दिसून येत आहे. त्याबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद तर देतोच परंतु माझे भाग्य आहे की माझ्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले व मला कार्यक्रमात भाग घेता आला त्यामुळे हुतात्मा महादेव शिंदे यांना प्रथम अभिवादन करतो व बलवडी गावात हुतात्मा भवन साठी 50 लाखाच्या निधीची घोषणा करतो असे सांगून हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बलवडी ता. सांगोला येथे बोलताना व्यक्त केला. 


या स्मारक अनावरण प्रसंगी अध्यक्षस्थानी मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख हे होते. 

     ऊन, वारा, पावसामध्येही देशाचे रक्षण करणारा सैनिक महत्त्वाचा घटक असून त्याची देश सेवा संपली तरी देशप्रेम संपत नाही व विजयदादा शिंदे यांनी ही गावाची योगदान असल्याचे सांगितले तसेच वीर माता पद्मिनी आई यांनी कुटुंब उभारून ताकद दिली व त्यामुळे साठ वर्षानंतर पुन्हा त्यांना वंदन करताना त्यांचे योगदान विचारात घ्यावे लागेल. असेच मान नदीत पाणी सोडले व आता विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावू व देशासाठी शिंदे कुटुंबाचा त्याग मोठा आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले. 

   सुरुवातीस प्राचार्य संभाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तसेच हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून एक सांगोला तालुक्यात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले. सदर प्रसंगी वीरमाता पद्मिनी आई शिंदे व सुभेदार राजेंद्र धायगुडे यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भजनी मंडळ व गजी ढोल या पारंपारिक वाद्याने कार्यक्रमात रंगत आणली. शिंदे कुटुंबास सर्व गावांनी सहकार्य केले व सर्वांनी मिळून समाधी स्थळ उभारले व त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहू असे माजी सरपंच विजय दादा शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार बाळू ताई भागवत, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, भाजपा नेते बाळासाहेब एरंडे, शिक्षण सभापती चेतन सिंह केदार, सभापती पुनम ताई इंगोले, जि प सदस्य शोभाताई खटकाळे, माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, माजी सभापती संभाजी तात्या आलदर, पानंद रस्ते सह अध्यक्ष सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते, डॉक्टर शिवराज भोसले, मच्छिंद्र मामा इंगोले, युवा नेते उल्हास दादा धायगुडे, अमर दादा लिगाडे, पोपटराव गडदे, प्रशांत वलेकर, चेअरमन संजय धायगुडे, चेअरमन शिवाजी शिंदे, नगरसेवक बाळासाहेब झपके, सरपंच ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, समाधान शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व संचालक, शिक्षक नेते रमेश शिंदे व सर्व परिवार, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी सैनिकांची लक्षणे उपस्थिती होती.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षक तात्यासो शिंदे तर सर्वांचे आभार माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले.


१) पालकमंत्र्यांकडून हुतात्मा भवनसाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा 


हुतात्मा महादेव शिंदे यांनी देशाच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे निश्चितपणे प्रेरणादायी आहे. येणाऱ्या पिढ्यांना या स्मृतिस्थळावरून नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त करताना या परिसरात नवीन हुतात्मा भवन उभारण्यासाठी  ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. 


    

२) शिंदे व साळुंखे कुटुंबांचे ऋणानुबंध.


    हुतात्मा महादेव शिंदे व ह.भ.प. स्व. शारदाताई साळुंखे पाटील यांचे बहीण भावाचे नाते होते व यापुढेही शिंदे व साळुंखे कुटुंबाचे ऋणानुबंध संबंध राहतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मान नदीत पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आता यापुढे त्यांनी पाण्याबरोबर विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावावेत. 

दिपकआबा साळुंखे पाटील,

माजी आमदार 



फोटो ;

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

अमृत महोत्सवाचे सुवर्णपर्व: करांडे स्कूलमध्ये ४७ पत्रकारांचा गौरव*

 *अमृत महोत्सवाचे सुवर्णपर्व: करांडे स्कूलमध्ये ४७ पत्रकारांचा गौरव* 



सांगोला (प्रतिनिधी)

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२७ निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, ड्रीम फाउंडेशन सोलापूर, करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने जुजारपूर येथील करांडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून समाजाच्या आशा-आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच समाजप्रबोधनाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक, दैनिक सकाळचे माजी निवासी संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अभय दिवाणजी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे व म.सा.प. सांगोला शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके हे होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे व समन्वयक, म.सा.प प्रमुख कार्यवाह प्रा. धनाजी चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर येथे पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर करांडे स्कूल जुजारपूर येथे विद्यार्थ्यांच्या बहारदार स्वागतसत्राने तसेच गणेश वंदन आणि सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा व मल्लखांबाचे चित्तथरारक सादरीकरण केले. यावेळी श्रीधर करांडे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित पत्रकारांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर, निमंत्रक आणि ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या ओघवत्या प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. स्वतः शून्यातून विश्व निर्माण करणारे, सायकलीवरून थेट दिल्ली गाठणारे आणि 'भाकरीवाला' अशी सर्वसामान्यांत आपली आगळीवेगळी ओळख जपणारे भतगुणगी हे एक ध्येयवेडे आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मनोगतातून, पत्रकारांना एकाच छताखाली आणून वैचारिक विचारमंथन घडवणे आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणे, हाच या कार्यक्रमाचा उदात्त उद्देश असल्याचे सांगत सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यानंतर उद्घाटन सत्रामध्ये अभय दिवाणजी यांचे बीजभाषण पार पडले. यावेळी पत्रकारांच्या वतीने पत्रकार मनोज उकळे यांनी आपल्या मनोगतात या सुंदर आयोजनासाठी संयोजकांचे कौतुक केले.चौथा स्तंभ म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या  सांगोला तालुक्यातील ४७ पत्रकारांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, विविध क्षेत्रांतील मान्यवर, म.सा.प. सांगोला शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, करांडे कुटुंबीय,करांडे स्कूलचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जावंजळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. धनाजी चव्हाण यांनी मानले.

 *चौकट १* 

 *पत्रकारितेने समाजाचा आरसा बनून सत्यनिष्ठेने कार्य करावे — ज्येष्ठ* पत्रकार अभय दिवाणजी

आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप आणि डिजिटल युगातील आव्हाने यावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सध्याच्या सोशल मीडियाच्या आणि वेगाने धावणाऱ्या बातम्यांच्या काळात बातमीदारीची अचूकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. पत्रकारांनी केवळ घटनांची नोंद न ठेवता, त्यामागील सत्य शोधून काढत बातमीतील वस्तुनिष्ठता जपावी. वृत्तलेखनाची जबाबदारी पार पाडताना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हे पत्रकारितेचे खरे सामाजिक उत्तरदायित्व आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण जडणघडणीत येथील स्थानिक पत्रकारांनी दिलेले योगदान अत्यंत दिशादर्शक असून, भविष्यातही लोकशाहीचा हा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भयपणे, निपक्षपातीपणे आणि सत्यनिष्ठेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 *चौकट २* 

 *अमृत महोत्सवी वाटचालीत पत्रकारांची भूमिका मोलाची — प्रा. प्रबुद्धचंद्र झपके* 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ७५ वर्षांच्या देदीप्यमान अमृत महोत्सवी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, गेली सात दशके संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, गुणवत्ता आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत  प्रयत्न केले आहेत. या प्रदीर्घ शैक्षणिक ज्ञानयज्ञात पत्रकारांनी नेहमीच सत्याची कास धरून संस्थेचे कार्य समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोलाचे काम केले. समाजातील घडामोडींचे अचूक पडसाद उमटवतानाच पत्रकारांनी आपल्या विधायक लेखणीतून नेहमीच समाजमनाची योग्य बांधणी केली आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करता आला याचा मनस्वी आनंद आहे. पत्रकारांनी भविष्यातही अशीच निर्भीडपणे सत्याची बाजू मांडावी आणि समाजाला प्रबोधनाची व विकासाची दिशा देण्याचे कार्य अविरत सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

कोळा येथे स्व. आ. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादात संपन्न*

 *कोळा येथे स्व. आ. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादात संपन्न*









कोळा : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, स्वर्गीय आमदार भाई डॉ. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास कोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सदरचे शिबिर दक्षता हॉस्पिटल , श्री हॉस्पिटल आणि लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपन्न झाले. या शिबिरामध्ये मोफत सर्वरोग, मुतखडा व मूत्ररोग तपासणी करण्यात आले असून गरजू रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया शिबिरा अंतर्गत मोफत करण्याचे आयोजन करण्यात आले.

            शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन या वेळी जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर यांच्या शुभ हस्ते झाले.स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी कोळा पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी तसेच या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. सोपान दाजी कोळेकर, सूत गिरणी चे संचालक श्री कुंडलिक आलदर सर, दिलीप देशमुख, माजी सरपंच मारुती सरगर सर, माजी सरपंच शहाजी हातेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री सीताराम सरगर, माजी ग्रा. प. सदस्य रमेश नाना कोळेकर, ग्रा प सदस्य शिवाजी आलदर, माजी उपसरपंच डॉ. सादिक पटेल, अशोक आबा आलदर, ग्रा. प. सदस्य दिलीप कोळेकर, ग्रा. प. सदस्य दगडू कोळेकर, ऍड धायप्पा आलदर, ऍड निलेश मदने, युवा नेते दत्ता सरगर, बाळासाहेब कोळेकर, अंबादास सरगर डॉ. बापूसाहेब सरगर,श्रीमती वंदना संजय सरगर, जुनोनी सोसायटीत चे चेअरमन बंडू व्हनमाने, युवक कार्यकर्ते अजर खाटीक, तुषार माने,दक्षता हॉस्पिटलच्या वतीने डॉ. किरण संजय सरगर-मस्के , डॉ. निरंजन केदार, श्री हॉस्पिटलचे डॉ. सागर तेली दक्षता हॉस्पिटल चा सर्व नर्सिंग स्टाफ ,धनराज ॲम्बुलन्सचे श्री.सचिन चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.

          या शिबिरात विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच मूत्ररोगाच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्याउपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसंदर्भातही सल्ला देण्यात आला.

              या आरोग्यसेवा उपक्रमाला कोळा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेत आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

सण, उत्सव, निवडणुकीत सहकार्य करावे.. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे* *पो.नि. राहुल देशपांडे यांचा सत्कार संपन्न..*

 *सण, उत्सव, निवडणुकीत सहकार्य करावे.. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे* 

 *पो.नि. राहुल देशपांडे यांचा सत्कार संपन्न..* 


सांगोला प्रतिनिधी 

      सण, उत्सव व निवडणूक काळात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे व त्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे कारण त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची ही सोडवणूक होते असे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. 


     सुरुवातीस सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या शुभहस्ते पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस प्रशासनास सहकार्य राहील असे रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, उपनगराध्यक्ष नितीन आबा इंगोले, पत्रकार सचिन धांडोरे, पत्रकार दत्तात्रय पवार, विनोद चंदनशिवे, करण मोरे, अक्षय मुढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन उपस्थित होते.



सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर.

 सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर. 

(सांगोला येथील प्रा.पी .सी. झपके व डॉ. सुदर्शन घेरडे यांची निवड)




सांगोला/प्रतिनिधी:

दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकरणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सांगोल्याचे प्राध्यापक पी .सी. झपके यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली तसेच सांगोला तालुक्यातील किडमिसरी गावचे सुपुत्र डॉ .सुदर्शन घेरडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आले.





 

सोलापूर जिल्हा परिषदेत ५०० शिक्षकांची भरती; शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी बळकटी! सभापती चेतनसिंह केदार-सावंत

 सोलापूर जिल्हा परिषदेत ५०० शिक्षकांची भरती; शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी बळकटी! सभापती चेतनसिंह केदार-सावंत 



सोलापूर | प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ५०० शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, सदर भरतीची जाहिरात दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर व्हावी आणि प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी ही शिक्षक भरती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


“शिक्षण हा विकासाचा पाया आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही आमची प्राथमिकता असून, शिक्षकांची उपलब्धता वाढवून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे,” असे मत सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद, सोलापूर  श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.


या भरतीमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचून आवश्यक पात्रता व अटींची पूर्तता करून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


“शिक्षण मजबूत, तर सोलापूरचा भविष्यकाळ मजबूत!”




चौकट | 


५०० शिक्षक भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय


जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ५०० शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून ही भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी भरतीची जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्धता आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी देणे, हा या भरतीमागील प्रमुख उद्देश आहे.


— श्री. चेतनसिंह केदार-सावंत

सभापती, शिक्षण व आरोग्य समिती

जिल्हा परिषद, सोलापूर


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

वासुद येथें स्व.आम.भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न*

*वासुद येथें स्व.आम.भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न*
*सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हनुमान मंदिर, वासुद येथे आयोजित मोफत सर्वरोग,मोफत मुतखडा- मूत्ररोग, मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर उदंड प्रतिसादात पार पडले. सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व रुग्णांची व वासुद ग्रामस्थांची आपुलकीने विचारपूस केली. स्व. आबासाहेबांचा विचार जपण्यात वासुद-अकोला ही क्रांतिकारी गांव नेहमी सांगोला तालुक्यात अग्रेसर राहत असतात असे मत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. शिबिरा निमित्त आबासाहेबांच्या आठवणींना वासुद ग्रामस्थ यांच्यावतीने उजाळा देण्यात आला. सदरच्या शिबिरामध्ये एकत्रित प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी मोफत तब्बल ५३ आयुष्यमान कार्ड वासुदवासीयांना काढून देण्यात आले.तसेच दक्षता हॉस्पिटल व केदार हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या.नँब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या वतीने मोफत नेतृत्व तपासणी चष्मे वाटप तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन हॉस्पिटल मार्फत शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये तब्बल दीडशेहून अधिक रुग्णांनी व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. सदरचे शिबिर अतिशय उत्साहात वासुद येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडले.*

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart