Recent
सोमवार, ६ जुलै, २०२६
पांडुरंग गायकवाड यांचे निधन
रविवार, ५ जुलै, २०२६
देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
सांगोला :- महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री तथा सोलापुर जिल्हा पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक श्री. जयकुमारजी गोरे साहेब व माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, आमचे मार्गदर्शक श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ राबविण्यात येत असून, या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथून करण्यात आला.
सभापती चेतनसिंह केदार सावंत स्वतः या अभियानाचे नेतृत्व करत असून, प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सखोल आढावा घेणार आहेत. अभियानातील त्रुटींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे.
नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान माता व बाल आरोग्य योजना, आयुष्मान आरोग्य मंदिराच्या १३ सर्वसमावेशक सेवा, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सार्वत्रिक लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किशोर आरोग्य, कुटुंब नियोजन, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, डेंग्यू व फायलरिया नियंत्रण, असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य सेवा, आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, रोग सर्वेक्षण (IDSP), मोफत औषध वितरण, प्रयोगशाळा सेवा, विविध तपासण्या तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, जनआरोग्य समिती (JAS) सदस्य, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या सर्व आरोग्य योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. सेवा वितरणातील त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या अभियानामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होऊन सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस सांगोला पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते, विस्तार अधिकारी जयंत टकले, सुरेश चौगुले, भाऊ पाटील, सुरेश आदाटे, विजयकुमार जावीर, रमेश पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, रियाज काझी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
“ देवाभाऊ जनआरोग्य अभियान ” हा केवळ आढावा घेण्याचा उपक्रम नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न आहे. एकही पात्र नागरिक शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सभापती चेतनसिंह केदार सावंत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
शनिवार, ४ जुलै, २०२६
सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*
*खिलारवाडी-हलदहिवडी 4.5 किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*
*सांगोला* : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी दरम्यानच्या 4.50 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सुमारे *7 कोटी रुपये* खर्चाच्या या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विशेष आग्रहावरून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
*6 गावांना थेट फायदा*
या रस्त्यामुळे फक्त खिलारवाडी आणि हलदहिवडीच नव्हे, तर *गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी* या एकूण सहा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ता झाल्याने शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे. तसेच या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होणारी *दूध आणि ऊसाची वाहतूक* देखील आता कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकणार आहे.
*शहाजी बापूंचे आश्वासन*
यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले,
_"खिलारवाडी आणि माझे जीवनाशी निगडीत जवळचे संबंध आहेत. गेली अनेक वर्षे राजकारण ते समाजकारणाच्या क्षेत्रात येथील लोकांनी मला मोठ्या ताकतीने पाठिंबा दिला आहे. मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायमचा आग्रही राहीन. राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी लवकरात लवकर निधी आणून सर्व कामे पूर्णत्वास नेईन."_
याचबरोबर त्यांनी या भागातील *पाण्याच्या कॅनॉलचा फाटा लवकरच कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे* आश्वासनही दिले.
*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*
या भव्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य *दादासाहेब लवटे*, पंचायत समिती सदस्य *बाळासाहेब बंडगर*, *उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील, ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले* यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल ; दिपकआबा साळुंखे पाटील
झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल ; दिपकआबा साळुंखे पाटील
लोकनेते रामशेठ ठाकूर व दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याहस्ते नवी मुंबई येथे झेनिथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात बांधकाम क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केलेल्या "झेनिथ कन्स्ट्रक्शन" ही कंपनी आगामी काळात मुंबई आणि नवी मुंबई परिसराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. झेनीथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, कंपनीने दर्जेदार निवासी, व्यावसायिक तसेच पायाभूत बांधकाम प्रकल्पांची यशस्वी उभारणी करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आधुनिक नियोजन, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे कंपनीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोजगारनिर्मितीला चालना देत सांगोला तालुक्यातील शेकडो ठेकेदार आणि तरुणांच्या हाताला या कंपनीने काम दिले आहे. एकंदरीत मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणारी ही संस्था भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन समारंभास माजी महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतमशेठ म्हात्रे , रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, नगरसेविका प्रतिभा भोईर, कार्यक्रमाचे नियोजक ज्येष्ठ नेते गणेशदादा कडू आदी मान्यवरांसह झेनिथ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा महेश पाटील, जितेश पाटील, तेजस पाटील, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संपूर्ण परिवाराला नूतन कार्यालयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून कंपनीने अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख प्रकल्प साकारत विकासाला गती द्यावी, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात आणि बांधकाम क्षेत्रात यशाची नवी उंची गाठावी, अशा सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.
चौकट
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल दिपकआबांचे गौरवोद्गार
मुंबई आणि नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. ते खऱ्या अर्थाने राज्याचे भीष्मपितामह आहेत. उद्योग व्यवसाय आणि राजकारणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात म्हणजे परीस आहे असे गौरवोद्गार काढत झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात लागला आहे आगामी काळात या व्यवसायाचे नक्कीच सोने होणार असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
फोटो ;
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम
सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सांगोला शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालविणे, तसेच निष्काळजी वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे आकर्षक फलक उभारण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त दुचाकी वाहन प्रदर्शित करून अपघाताच्या भीषण परिणामांची जाणीव नागरिकांना करून देण्यात येत आहे.
"Helmet is costly, But Brain is priceless!" या प्रभावी संदेशाद्वारे दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात असून, "अति घाई संकटात नेई" या संदेशातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांबाबत जागरूकता निर्माण करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करून स्वतःसह इतरांच्याही जीविताचे रक्षण करावे, असे आवाहन सांगोला पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा :- भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत
आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा :- भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत
कासेगाव, (पंढरपूर) : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार, तत्पर व अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज. या अनुषंगाने कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियोजन व आढावा बैठक पार पडली.
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि प्रत्येक पालखी सोबत ALS रुग्ण वाहिका देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. वारकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचा महत्त्वपूर्ण सोहळा असून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. आषाढी वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण उद्भवू नये, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही यावेळी सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
याबैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री. सतीश कोपुरवाड तसेच या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
चौकट :
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
“आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली सेवा आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.











Social Media Icons