Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.

 चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत  बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.



सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत सुरेश बाबर यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत बाबर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी सोडून गावी येऊन आपली शेती हीच इंडस्ट्री म्हणून काम सुरू केले. शेती ही ढोबळमानाने न करता वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केली तरच शेती फायद्याची ठरेल. शेती करत असताना सेंद्रिय ,रासायनिक आणि जैविक या खतांचा योग्य वापर करून शेती केली तर फायदेशीर ठरते. शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघेल असे ध्येय ठेवले तरच शेती आणि शेतकरी यांचे समीकरण जुळते. अभिजीत बाबर यांनी भाजीपाला व डाळिंब शेतीमध्ये प्रगती करून नवलौकिक मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रगतशील युवा शेतकरी गुलाबराव भीमराव बाबर यांनी डाळिंब, द्राक्षे, ढोबळी मिरची या पिकाच्या माध्यमातून शेतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून नावलौकिक मिळवला. त्यांचाही सर्वत्र गौरव होत आहे. शिवजयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड 



*चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बदलत्या युगात इतिहास व धार्मिक ग्रंथ अभ्यासणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व गोष्टीत पारंगत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसुर्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य रयतेसाठी सर्वधर्मसमभावाचे असे होते. देव, देश, धर्म रक्षणासाठी जिजाऊंनी पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी देवाकडे प्रार्थना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या पिढीने आचरणात आणले पाहिजेत .जिजाऊंनी सार्वभौम राजा घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप मोठे संस्कार केले .छत्रपती शिवाजी महाराजांनी 1644 ला तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले. क्रूर अशा अफजलखानाचा वध करून रयतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. चोपडी येथील शिवस्मारक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचेही तैल चित्र लावावे व दररोज पूजन करावे. शिवतीर्थाच्या ठिकाणी गावातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी आपुलकी व प्रेरणा निर्माण करावी असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी चोपडी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ बाबर हे होते.



चोपडी तालुका सांगोला येथे शिवजन्म उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते  सुनीलबापू लाड यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सुनील बापू लाड, डॉ, नवनाथ बाबर, उपसरपंच पोपट यादव , बाळासाहेब यादव, उद्योगपती सुभाष बाबर, उद्योगपती सतीश पाटील,चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, जनार्दन बाबर सर , पत्रकार दशरथ बाबर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समाजासमोर आणणे गरजेचे आहे. जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती सोहळा अखंडपणे प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. हा कौतुकास्पद सोहळा निश्चितच गावातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉल्बी मुक्त शिवजयंती उत्सव साजरा करणे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशर माती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रगतशील शेतकरी सतीश पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू करण्याची प्रथा बाळासाहेब यादव यांनी सुरू केली असून ही प्रथा आजही अखंडपणे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे . जयंतीनिमित्त सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक , नोकरी , व्यवसाय, शेतीक्षेत्र आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास सलाम केला जातो.  शिवरायांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चोपडी गावातील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चोपडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिवप्रेमींनी पारंपारिक मर्दानी खेळ, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली . भजनी मंडळानेही टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये मिरवणुकीत शोभा वाढवली.तसेच हलगीच्या तालावरती लेझीम खेळाडूंनी आपली कला सादर केली. मिरवणुकीमध्ये अबालवर्धानी सहभाग घेतला होता. जय शिवराय, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून लवकरच शिवस्मारक पूर्णत्वास येईल. शिवजयंती सोहळ्यानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी मोटरसायकल रॅली काढून जनजागृतीबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय ,अशा घोषणा देऊन इतिहासाविषयी जनजागृती केली. प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दृष्टिक्षेपात आणला. वक्तृत्व स्पर्धेसाठी राजकुमारशेठ भोसले यांनी 10000 हजार रुपयांचे बक्षीस दिले. तसेच चेअरमन भिकाजी बाबर यांनीही विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. मंडळाने विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळवून दिले. वेगवेगळ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी कबीर मुलाणी व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर गौरवपर पोवाडा सादर केला. सुभाषशेठ बाबर यांनी शिवगौरवपर कविता सादर केली. शिवजयंती सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. आर्मीमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या तरुणांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रतीक दत्तात्रय बाबर ,प्रदीप प्रकाश खंडागळे, रितेश संजय खंडागळे,

अतुल दिलीप चव्हाण,सुमित ज्ञानेश्वर बाबर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक प्रगतशील शेतकरी अभिजीत सुरेश बाबर,

गुलाब भीमराव बाबर यांचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम करण्यात आला. पुरवठा अधिकारी विशाल मेखले यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बजरंग बाबर व सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील कालिदास जवंजाळ सर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे तसेच कार्यक्रमानिमित्त उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी केले.


माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगोला (प्रतिनिधी):

सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं. 139/2026 प्रमाणे बी.एन.एस. कलम 303 (2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये बेकायदेशीर वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी पोना/1228 सुजित रामचंद्र जाधव (वय 39 वर्षे, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चिनके (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील चिनके ते माण नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, दिलावर तांबोळी यांच्या शेताजवळ कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी तानाजी महादेव शितोळे (वय 25 वर्षे, रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो चारचाकी पिकअप (आरटीओ क्रमांक MH 10 BR 0227) वाहनातून शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही अधिकृत परवानगी न घेता माण नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना आढळून आला.

पोलीसांनी कारवाईदरम्यान अंदाजे ५,००,००० रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन तसेच सुमारे ७,००० रुपये किंमतीची अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ५,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्दी रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ/1264 भानवसे हे करीत असून, दाखल प्रक्रिया पोहेकॉ/138 भोसले यांनी केली आहे.

बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार



बार्शी /प्रतिनिधी:

पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) पाटील यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल बार्शीतील पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देऊन दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेत, मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने व आश्रयाने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या करिअर घडविण्यासाठी शैक्षणिक सहाय्य तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य सुदृढ राहणे अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्परतेने मदतीचा हात देणे ही दुर्मीळ बाब आहे. आर्थिक मदतीसोबतच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख अधिक दृढ झाली आहे. बार्शीतील या सत्कार सोहळ्याने पत्रकार बांधवांच्या एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित केला. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सत्कार प्रसंगी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 



वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाटंबरे येथे 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.    

              या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त/दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853 व भाग्यवान पवार 9561546144 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.



सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांची निवड अभिमानास्पद - अध्यक्ष रविराज शेटे*

 *सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांची निवड अभिमानास्पद - अध्यक्ष रविराज शेटे*


 

सांगोला प्रतिनिधी 

        अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली व यामध्ये अध्यक्षपदी राजाभाऊ माने, प्रदेश महासचिव पदी विकास भोसले यांची निवड झाली परंतु  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोल्याचे संपादक सतीश भाऊ सावंत यांची व उपाध्यक्षपदी संपादक चांद भैया शेख यांची निवड होणे म्हणजे सांगोल्याच्या दृष्टीने अभिमानाची आहे व दोघांची निवड म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगोला तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगोला येथे दोघांच्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. 

       सावंत व शेख यांच्या दोघांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांनी योग्य न्याय व सन्मान दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांनी संघटना वाढीसाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करू असे सत्कार प्रसंगी सांगितले. 

      यावेळी उपाध्यक्ष सचिन धांडोरे, सचिव दत्तात्रय पवार, सदस्य विनोद चंदनशिवे, करण मोरे, समाधान धांडोरे, सचिन कुंभार, सुनील पवार, समाधान गंगणे, कृष्णदेव इंगोले, मा. सरपंच संतोष पाटील इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन दांडोरी यांनी तर सर्वांच्या आभार दत्तात्रय पवार यांनी मानले.


रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने*

 *अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने* 


 *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले*



 कोल्हापूर/ प्रतिनिधी 

 अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

    यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 

(निवडीनंतर नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडीनंतर संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न तोळमापीचा प्रश्न यास अन्य प्रश्नावर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू माझ्यावर जोश विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पत्रकारांच संघटन बळकट करू असा विश्वास सतीश सावंत यांनी उपस्थित पत्रकारांना दिला)

 


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart