Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

बुधवार, १ जुलै, २०२६

सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत

सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत 

सोलापूर | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील (GR) निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.

शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या शिफारशीनुसार मा. श्री. कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी वर्गवाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व निकषांची पडताळणी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची अडचण, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याची समस्या निर्माण होत होती. आता गावातच पाचवीचा वर्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पालकांचा आर्थिक व मानसिक ताणही कमी होणार आहे.

या निर्णयामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला घराजवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला यामुळे बळ मिळणार आहे.या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

चौकट 
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी सुरू करण्यास मंजुरी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे शाळा गळती कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे बळ मिळेल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.”ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे.
– मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत
सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद सोलापूर

सोमवार, २९ जून, २०२६

भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

 भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन. 


वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला  (वाटंबरे )येथील भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि 30 जून रोजी दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय 61 होते त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,चार मुली असा परिवार आहे. 

त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. 2 जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.



🎤 KHABARDAR NEWS 

✨ आवाज जनतेचा ✨

━━━━━━━━━━━━━━━

🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 

🟨 संपर्क: दत्तात्रय पवार

📞 मो:8007913668

मानेगाव येथे हृदयद्रावक घटना (मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)

 मानेगाव येथे हृदयद्रावक घटना 

(मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४२ वर्षीय असलम अब्दुल सय्यद यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली जाण्याचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांत त्यांच्या ६७ वर्षीय आईचेही निधन झाले. त्यामुळे अवघ्या १२ तासांच्या अंतरात माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर ओढवली.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे असलम सय्यद यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच जन्मदात्या वृद्ध आईचेही हृदयविकाराच्या धक्क्यानेच निधन झाल्याने मानेगावात ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवार, २८ जून रोजी मानेगाव ता. सांगोला येथे घडली.

असलम अब्दुल सय्यद (वय ४२) व अयुफा अब्दुल सय्यद (वय ६७) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. मृत दोघांवर सायंकाळी स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


रविवार, २८ जून, २०२६

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.



वाटंबरे/ प्रतिनिधी:
सांगोला राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्यानी मंदिरामध्ये लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची विटंबना करत दीड किलोचा मुकुट, मनी मंगळसूत्र तसेच काही ऐवज लंपास केला  या  चोरीच्या घटनेने पूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ माजली होती.या चोरीच्या संदर्भात राजुरी ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्यात आले होते तसे या चोरीचा लवकर तपास न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची प्रशासनास ग्रामस्थांच्या वतीने इशारा देण्यात आला होता.  आ. बाबासाहेब देशमुख यांनी काल रविवार दि. २८ जून रोजी दुपारी तीन वाजता राजुरी येथे भेट देत या चोरीच्या संदर्भातील सर्व माहिती  ग्रामस्थांकडून घेतली यावेळी ग्रामस्थांकडून चोरीचा संथ गतीने चालू असलेला तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली . यावेळी त्यांनी पोलीस प्रशासना बरोबर चर्चा करून या चोरीचा तात्काळ तपास  करत चोरट्यांना  अटक करण्यात येईल  असे आश्वासन बैठकीत ग्रामस्थांना दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर राजुरी ग्रामस्थ   उपस्थित होते .
जे

नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न

 नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती  चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न 


“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश; प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन



सांगोला, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी उपस्थित पालक व नागरिकांना मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. पोलिओ हा लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील दोन थेंब आवर्जून पाजावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येक पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.



या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती उपसभापती श्री. अजय सरगर, सांगोला पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओंकार कोरे, श्री. संजय शेळके, श्री. भालचंद्र भंडारे, श्री. रमेश पाटील, श्री. नामदेव आलदर, श्री. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. जिलानी काझी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!” असा निर्धार व्यक्त केला.


शनिवार, २७ जून, २०२६

चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश

चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश 
* अभिषेक चौगुले याने 99.32 % गुण मिळवून चोपडी गावचे नाव केले उज्वल
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याने महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी सीईटी  2025-26 परीक्षेत सुयश 99.32 टक्के गुण मिळवून चोपडी गावचा लौकिक वाढवला आहे. अभिषेक चौगुले याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी अभिषेकच्या यशाबद्दल त्याचा सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
अभिषेक चौगुले याला दहावीमध्ये 94.40 टक्के गुण मिळाले होते. तसेच बारावीमध्ये 80.33 गुण मिळाले आहेत. अभिषेक चौगुले हा पुढील शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयातून computer science या शाखेतून पूर्ण करणार असल्याचे त्याचे पालक अनिल चौगुले यांनी सांगितले आहे.

बुधवार, २४ जून, २०२६

अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू

 अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू




वाटंबरे/प्रतिनिधी -अति मद्य प्राशन केलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमास नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.ही घटना काल बुधवार २४ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वाटंबरे ता. सांगोला येथील उबराव मिसाळ यांच्या व्यापारी संकुल समोर

घडली.उत्तम दामोदर नकाते ( वय -७०, रा.अकोला ता सांगोला ) असे मृताचे नाव आहे 

याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाटंबरे ग्रामस्थ गेल्या ४ वर्षापासून गावात अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत अवैध विक्री व्यवसाय बंद होण्याऐवजी  जोमाने सुरू आहे दरम्यान काल सोमवार काल सोमवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथील उत्तम नकाते या वृद्धाने अति मद्यप्राशन केल्याने तो जागीच बेशुद्ध होवून पडला होता या घटनेची माहिती सरपंच नामदेव पवार यांनी पोलीस स्टेशन  , तहसीलदार यांना दिल्याने तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे , राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी पंकज कुमार व गडदे यांनी तात्काळ वाटंबरे गावात भेट दिली असता पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी पुतण्या नितीन नकाते यांनी उत्तम नकाते यांना बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे करीत आहेत.


 (राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन वाटंबरे गावात अवैद्य रित्या देशी विदेशी दारू विक्रीत्यावर कारवाई करत  ३२ हजार रुपयेची देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला.)


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart