Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने*

 *अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने* 


 *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले*



 कोल्हापूर/ प्रतिनिधी 

 अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

    यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 

(निवडीनंतर नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडीनंतर संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न तोळमापीचा प्रश्न यास अन्य प्रश्नावर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू माझ्यावर जोश विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पत्रकारांच संघटन बळकट करू असा विश्वास सतीश सावंत यांनी उपस्थित पत्रकारांना दिला)

 


निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

 “निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

पराभवानंतरही जनतेच्या दारी!”* 


 *ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटातील 13 गावांत जाऊन मतदारांचे मानले आभार.......* 


सांगोला तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटातून युवा नेते ॲड. सूर्यादित्य उर्फ यशराजे दीपकराव साळुंखे पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी जनतेच्या भेटीगाठींचा दौरा सुरू करत, “निवडणूक ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेचे साधन आहे,” हा संदेश कृतीतून दिला.

जवळा जिल्हा परिषद गटातील संगेवाडी, मांजरी, बामणी, मेथवडे, सावे, राजापूर, वाढेगाव, देवळे, मेडशिंगी, आलेगाव, वाकी-घेरडी, वाणीचिंचाळे व जवळा अशा एकूण १३ गावांमध्ये जाऊन त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधत, “पराभव झाला म्हणून घरात बसणार नाही; तुमच्या सुख-दुःखात कायम उभा राहीन,” असा शब्द दिला.

या आभार दौऱ्यात वाढेगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सौ. वंदना भरत शेळके तसेच जवळा पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या आलेल्या सौ. पुनम सुदर्शन इंगवले यांनीही विविध गावांमध्ये उपस्थित राहून मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. दोन्ही मान्यवरांनी “जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करून दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत आगामी काळातही एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “गत निवडणुकीत आपण जनतेसमोर जी वचने दिली होती, ती कामाच्या स्वरूपात पूर्ण करण्याचा प्रयत्न यापुढेही जोमाने सुरू राहील. झालेला पराभव विसरून आपण विकासाच्या दिशेने एकत्र वाटचाल करूया.”

या निवडणुकीत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सांगितले, “यशाने यंदा हुलकावणी दिली असली तरी अपयशाने मी खचणार नाही. आमच्या साळुंखे पाटील कुटुंबाच्या रक्तातच जनसेवा आहे. लोकसेवेची बांधिलकी भविष्यातही तेवढ्याच ताकदीने जपणार आहे.”

या आभार दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या आवाजात जिद्द दिसून आली. “कार्यकर्त्यांच्या भावना हीच माझी खरी शिदोरी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


तसेच आजपासून संपूर्ण जवळा गटासह सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात तरुणांशी संवाद साधून तरुणांची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पराभवाच्या सावटातही सेवाभाव, जिद्द आणि जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा निर्धार व्यक्त करत ॲड.यशराजे साळुंखे पाटील यांनी आगामी काळातही लोकहितासाठी अविरत कार्यरत राहण्याचा शब्द दिला.




शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

हिंदुस्तान फीड्स , पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्य व सॅनिटायझर पॅडचे वाटप.

 हिंदुस्तान फीड्स , पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्य व सॅनिटायझर पॅडचे वाटप.



वाटंबरे/प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे येथे हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत शुक्रवार दि.13 फेब्रुवारी रोजी शालेय साहित्य व मुलींसाठी सॅनिटायझर पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार यांनी आपल्या मनोगतातून  हिंदुस्तान फीड्स व पवार उद्योग समूहाने  राबविलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


यावेळी   हिंदुस्तान फीड्स चे निलेश इंगळे यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनीच्या वतीने चालू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून  माहिती दिली यावेळी मधुकर पवार, दत्तात्रय पवार यांनी हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी  पवार उद्योग समूहाचे  मोहन पवार, सुभाष पवार ,ज्योतीराम आवताडे ,प्रवीण पवार, महेश इंगळे, नंदकुमार गायकवाड,शिवराज पवार, नवनाथ पवार, पर्यवेक्षक रमेश शिवशरण, खंडागळे सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था

  

          *मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था*



         उद्या दिनांक 09/02/ 2026 रोजी मतमोजणी   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून पोस्टल मतदान मतमोजणी 3 टेबलवर स्वतंत्र ठेवलेली असून,  मतमोजणी अगोदर होईल त्यानंतर 20 टेबल ईव्हीएम द्वारे झालेल्या मतांची मतमोजणी होणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी 8:00 वाजता कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मत मोजणी करण्या अगोदर पोस्टल मतमोजणी होईल त्यानंतर 20 टेबल वरती 1)पहिली फेरी  सकाळी 10:00 :वाजता सुरू करण्यात येईल मतमोजणी  पहिले दोन फेऱ्या जिल्हा परिषद महुद गट व गणाची सुरू होईल

 2) तिसरी व चौथी फेरी

 एकतपुर गट व  गणाची होईल 3) त्यानंतर नंतर पाचवी, सहावी  व सातवी फेरी जवळा गट व  गणाची मतमोजणी होईल 4)त्यानंतर  आठवी, नववी व दहावी फेरी कडलास गट व गणाची होईल 5) त्यानंतर  अकरावी व बारावी फेरी चोपडी गट व गणाची होय

6) त्यानंतर  13, 14 व 15 वी फेरी कोळा गट व गणाची होईल 

7)त्यानंतर  16 ,17  व 18 वी फेरी घेरडी गट व गणाची होईल.   

                वरील प्रमाणे मतमोजणी 20 टेबलवर असून एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून एकूण 140 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे तसेच.  

         मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उमेदवाराचे प्रतिनिधी ,माध्यम प्रतिनिधी यांना नियमानुसार प्रवेश  देण्यात येणार आहे संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर काटेकोर लक्ष राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली आहे


शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य मतदान पेटीत बंद 70% टक्के मतदान झाले*


        *जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य मतदान पेटीत बंद 70% टक्के मतदान झाले*    


               आज दिनांक 07/02/2026 रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तालुक्यातून 32 क्षेत्रिय अधिकारी सकाळी 6:00 वाजल्यापासून 274 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून आज दिवसभर सतत भेटी देऊन अडचणीचे निराकरण करणे, मॉक पोल अहवाल सादर करणे, सुरुवातीला काही केंद्रावर मॉकपोल पूर्वी बॅलेट युनिट  बदलून दिल्याने कोठेही अडचण निर्माण झाल्या नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले 

        या निवडणुकीत जि प साठी 129 व पंचायत समितीसाठी 178 उमेदवार रिंगणात उभे होते त्यांच्या साठी 1,83,662 इतक्या मतदारांनी मतदान केले

पुरुष मतदार=  94972 स्त्री मतदार = 88414 इतर मतदार=2  एकूण मतदार=1,83,662

 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण 70% झाले असून मतदाना ची आकडेवारी घेण्यासाठी  नियंत्रण कक्षात 10 टेबल ठेवले होते त्या ठिकाणी संगणक तज्ञ व नियंत्रित अधिकारी बाळासाहेब मोरे प्रभारी नायब तहसीलदार, तसेच पथक प्रमुख सचिन कुंभार सहाय्यक महसूल अधिकारी, आकाश गोडसे, समाधान वाघमोडे सर, अमोल देशमुख सर, अण्णासो सरगर, आर एन टी सुनील बेलभंडारे, सोमनाथ साळुंखे हे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांचे नियंत्रणात कामकाज करीत असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले 

       सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार व तरुण मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले बरेच लोक दूरगांवी व कामानिमित्त नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर दिसून आले आणि त्यांच्यासाठी प्रशासनाने सुरक्षा पोलीस बंदोबस्त  मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला तालुका पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी  तसेच आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप देवकते यांनी वैद्यकीय सुविधा 274 केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक, सहाय्यिका , आशाताई व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात दिसून आले, ग्रामपंचायत अधिकारी,  महसूल अधिकारी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील  बी एल ओ क्षेत्रिय अधिकारी आणि *आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला* या सर्वांनी सकाळपासून खूप कष्ट घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले आहे व सर्वांचे प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानले आहे तसेच तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे


बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील

 विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील



चोपडी गटात परिवर्तनाची चाहूल; चेतनसिंह केदार सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांत विकास कामांचा ठसा उमटलेला असून शेती, पाणी, रस्ते व वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णायक काम झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीतून साध्य करायचा असेल तर महायुतीला साथ देणे काळाची गरज आहे, असे ठाम मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

      चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


      यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. विविध जलसिंचन योजना, कालवे व पाणी साठवण प्रकल्पांमुळे बागायती शेतीचे प्रमाण वाढले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. ग्रामीण रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीजपुरवठा व डीपीचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचणी येत नाहीत. हाच विकासाचा धागा जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तेथेही महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

      यावेळी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आल्यास पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. विकासाचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच महायुतीचे धोरण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रचार सभेला सरपंच बंडू बाबर, तानाजी बाबर, विश्वनाथ आप्पा बाबर, दादासाहेब बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला स्पष्ट पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला.


मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


 ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन जनतेसमोर - चेतनसिंह केदार सावंत 


सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीला पाठिंबा देणे काळाची गरज आहे. गावागावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न. सोडवण्याचे काम महायुतीच करू शकते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असून या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेआहे. ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या माध्यमातूनच गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.

     


  महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर, राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ.सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ उदनवाडी, चोपडी, पाचेगाव, बलवडी येथे प्रचार सभा घेण्यात आली. 

        यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, “महायुतीचे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे वेगाने मार्गी लावली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक सामान्य कुटुंबाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न महायुतीने पाहिले आहे, आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत,” अशी ठाम भूमिका चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी महायुतीच्या वतीने जनसंवादाच्या माध्यमातून मांडली.

       यावेळी पाचेगाव येथील सरपंच संगीता संजय भोसले, निवृत्ती मिसाळ गुरुजी, गोरख भोसले, संजय भोसले, तानाजी मिसाळ , आण्णासो पाटील, आबासो पाटील, दत्तात्रय मिसाळ, भारत मिसाळ, पोपट घुले, दुर्योधन घुले, भारत चव्हाण, तात्यासो मिसाळ, महेश गुरव, चोपडी येथील सरपंच श्रीमंत सरगर, उपसरपंच पॉपटशेठ यादव, दगडू बाबर, आर.एस.बाबर सर, सुरेश बाबर, अनिल चौगुले, मेजर अमोल बाबर, विनायक बाबर, बंडू मेखले, ॲड .शरद यादव, लक्ष्मण चौगुले, पोपट बाबर, विठ्ठल जरग, बाळासो बाबर, सचिन खळगे, सुरेश जाधव, बलवडी येथील मारुती शिंदे, महादेव शिंदे, दत्तात्रय निंबाळकर, साहेबराव शिंदे, विनायक शेंबडे, जैनुद्दीन शेख, जुबेर मुजावर, प्रशांत वलेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart