खबरदार न्युज पोर्टल सांगोला मुख्य संपादक दत्तात्रय पवार मोबा 8007913668, या न्युज पोर्टल वर प्रकाशित बातमी शी संपादक सहमत असतीलच नाही. कोणताही वाद सांगोला न्यायालयाच्या कक्षेत.
सांगोला (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने असलेल्या पुढील कारचे टायर फुटल्याने व पाठीमागून येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने या अपघातात कारमधील दोघा माय लेकरांचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर कुटुंबातील अन्य 6 महिला, पुरुष व लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि.25 मे रोजी दु. 12 वाजणेच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील जुनोनी ता. सांगोला येथे घडली आहे.
संदिप भोसले वय 32 व रेखा भोसले वय 60 दोघेही रा. पलूस एमआयडीसी पलूस जि. सांगली अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर वेदांत भोसले वय 10, वैभव भोसले वय 12, दुर्वा भोसले वय 5, विद्या भोसले वय 36, ज्योती भोसले वय 30 हे गंभीर जखमी तर अनिल भोसले वय 36 हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पलूस जि. सांगली येथील भोसले कुटूंबीय सध्या अधिक महिना सुरू असल्याने देवदर्शनासाठी मिरज सांगोला रोडवरून मारुती सुझुकी कारमधून पंढरपूर येथे निघाले होते, दरम्यान त्यांची कार जुनोनी ता. सांगोला जवळील बायपास जवळ आली असता त्यांच्या कार च्या पुढे असणाऱ्या कारचे टायर फुटला व दुसऱ्या लेनवरील भोसले यांच्या ताब्यातील असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने मारुती सुझुकी कार डिव्हायडरला धडकून दोन, तीन पलटी मारल्याने कारमधील संदीप भोसले व रेखा भोसले या माय लेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर वेदांत भोसले, वैभव भोसले, दुर्वा भोसले, विद्या भोसले, ज्योती भोसले हे गंभीर जखमी तर अनिल भोसले हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे, याबाबत सांगोला पोलिसांत नोंद झाली नव्हती.
पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे :पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन
वाटंबरे/ प्रतिनिधी -
पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून, प्रत्येक गावातील माहिती वेळोवेळी पोलीस स्टेशनला सांगणे गरजेचे आहे व पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे असे मत नूतन पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी नाझरे दूरक्षेत्र कार्यालयात सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असून, मी नाझरे पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालो व पोलीस पाटलांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत व आभार मानतो असेही पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांची आढावा बैठक घेतली.
सदर प्रसंगी पोलीस नाईक सुजित जाधव, पो.हे. कॉन्स्टेबल संजय भानवसे, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, संतोष भडंगे, सीता देवी पाटील, पांडुरंग पवार, वनिता कोकरे, रामचंद्र चौगुले, विकास आदाटे, संध्या नलवडे, गोपाळ जाधव, मंगेश जंवजाळ, विजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे इ. उपस्थित होते. शेवटी पोलीस नाईक सुजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.
नाझरे : येथील साठे नगर परिसरातील वळण रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी सांगोला या मुख्य रस्त्यावर साठे नगर परीसर येत असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वीही काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांनासाठी भाजप सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे यांचे निवेदन.
सांगोला/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित शासकीय प्रश्नांना गती मिळावी आणि त्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, या उद्देशाने सोलापूर शहरात “सेवा अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षका च्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. संतोषजी साखरे यांनी उपस्थित शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, प्रलंबित शासकीय कामे आणि अपेक्षा जाणून घेतल्या. अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून शिक्षक व पदवीधरांना न्याय मिळवून देणे, हाच या “सेवा अभियानाचा” मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश संयोजक डॉ प्रशम कोल्हे सर,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोक बबनराव उकिडे, पुणे विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.नारायण राजुरवार मा. आमदार भगवानराव साळुंखे , भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.शशिकांत चव्हाण, विक्रमजी देशमुख ,प्रा.डॉ रोंगे सर, प्रा सुरेशजी गुंड,प्रा प्रशांत शिंपी ,सरचिटणीस आमोल साखरे,दत्ता पाटील प्रा.संजय टोम्पे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने तिसरे राष्ट्रीय महा अधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे ४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते, ह्या महा अधिवेशनाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.
ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार या सह अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधातील विविध संविधानिक बाबी या बाबतीत सखोल व अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
पणजी येथे आयोजित डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महा अधिवेशनात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) या विषयावर ते बोलत होते.
ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांना सन्मान चिन्ह ,शाल ,गुलाब पुष्प देऊन पणजीचे खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी सत्कार केला.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंदशेठ तानावडे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते. ह्यावेळी संपादक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार*
*पाणी गुणवत्ते साठी आरोग्य कर्मचारी यांनी लक्ष द्यावे*
*आरोग्य समिती समिती सभा संपन्न*
सोलापूर - सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आरोग्य समिती सभा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार - सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी समितीच्या सदस्या सोनाली कडते, संगिता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.
या सभेमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पारदर्शक पध्दतीने आरोग्य विभागाचा कारभार झाला पाहिजे. तुमच्या अडचणी असतील तर सांगा त्यावर मार्ग काढला जाईल. ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता चांगली राहणे साठी प्रयत्न करा. वेळेत पाणी नमुने तपासणी झाली पाहिजे. सध्या पाणी टंचाई लक्षात घेता गुणवत्तेकडे लक्ष द्या.
तसेच ग्रामीण भागातील जनतेला श्वानदंश लस मिळाली पाहीजे. त्यासाठी जि.प.सेस मधुन ५०.०० लाख तरतुद आहे परंतू या साठी १५०.०० लक्ष (दिड कोटी) तरतुद अपेक्षित आहे. त्याबाबत पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आरोग्याच्या दृष्ट्रीने चांगले काम कसे होईल याचा आराखडा तयार करा. अशा सुचना सभापती केदार सावंत यांनी केल्या.
प्रत्येक प्रा.आ.केंद्राला भविष्यात सोलर सिस्टिम बसवण्याबाबतचे काय करता येईल याबाबतचे नियोजन करणे बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना केल्या.अपंग मुलांचा सर्व्हे करुन अपंग असलेल्या सर्वांना सर्टिफिकेट मिळणेबावत तालुकास्तरावर कॅम्प घेणेबाबत लवकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समिती सभा अधुन मधुन तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी सुचना मांडली. गेल्या दोन वर्षापासुन तालुका आरोग्य अधिकारी यांचे वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च केलेल्या गोष्टींचे बीले पेंडींग आहेत. त्याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याबाबत व ती बीले त्यांना मिळणेबाबत आवश्यक त्या निधीसाठी पाठपुरावा करणेच्या सुचना दिल्या .
जि.प.सेस च्या २०२६-२७ च्या मुळ ५१०.०८ लक्षच्या मुळ अंदाजपत्रकाच्या विषयास शिफारस मान्यता घेण्यात आली.जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या मंजूर आराखडयास शिफारस करणेसाठी मान्यता घेण्यात आली.
*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन*
*गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कला अकादमी येथे होणार उद्घाटन*
देशातील सर्वात मोठी डिजिटल मीडियातील संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न होणार असून या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, स्वागताध्यक्ष गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोवा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री रमेश तवडकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,अध्यक्ष आयुष्यभान भारत योजना महाराष्ट्र ओमप्रकाश शेटे , गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,खासदार सदानंद शेठ तानावडे, चंदगड चे आमदार शिवाजी पाटील, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष राजा माने व संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व राज्य सचिव विकास भोसले यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत,राज्य उपाध्यक्ष संजय भैरे,मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख,राज्य संघटक मयूर गलांडे यांची उपस्थिती होती.
डिजिटल मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, तेलंगाना,आंध्र प्रदेश,पंजाब, दिल्ली या राज्यातून हजारो संपादक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत संपादक व मध्यम तज्ञ राजा माने हे घेणार असून यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराची घोषणा राजा माने यांनी केली.
महा अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून ऍड. संदीप कायदे (पंढरपूर )यांचे ’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ऍड.नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांचे ’समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा’...,सौमित्र देसाई, पूणे यांचे AI चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडियातील विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे ठराव यावर चर्चा करून अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे.
पणजी गोवा येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, या महाधिवेशनाचा फायदा देशभरातील डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.
*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय वतीने पुरस्कारांची घोषणा*
राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त मान्यवर
1) श्री. कमलाकांत तारी,(गोवा ) गोवंश
संवर्धक
2) डॉ. महुवा शाह,(गोवा )
शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी
3) आमदार निलेश राणे , कुडाळ (विधिमंडळ उत्कृष्ट कार्य )
4)श्री. कमलेश बांदेकर, (गोवा )
योग प्रसारक
5)श्री दीपक नार्वेकर,(गोवा )
उत्कृष्ट प्रशासन
6)श्री. गुरुप्रसाद पावसकर, (गोवा )
आयुक्त, दिव्यांग संचालनालय
7) सौ. नेहा आंग्रे,गावस, (गोवा )
समाजसेवा
8) मा.प्रकाश कुलकर्णी,मुंबई ( कृषी )
9)मा. माणिक तुकाराम शेडगे सातारा ( सामाजिक कार्य )
10) मा. सौ.चित्राताई क्षीरसागर ,गोवा ( कवयित्री व साहित्यिक )
Social Media Icons