Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

बुधवार, १७ जून, २०२६

नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

 नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. 



सांगोल तालुका उदनवाडी येथील श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या प्रशालेतील सहशिक्षक नारायण पवार यांना मुंबई येथे १४ जून रोजी बी दी चेंज फाउंडेशन यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात केला.

 यावेळी नारायण पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या पुरस्कार वितरण सोहळ्यात  सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार IAS सुमित रेवरी , डेप्युटी कमिशनर GST नंदकुमार दिघे,ACP रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री निवेदिता पगार तसेच अमृत रोहोम , मयूर ढोकळे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर ईतर मान्यवर उपस्थित होते. 

नारायण पवार सर यांचे मूळ गाव वाटंबरे व ते शिक्षक म्हणून उदनवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. वाटंबरे ग्रामस्थ तसेच उदनवाडी प्रशालेतून व  ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.


रविवार, १४ जून, २०२६

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.




महावितरण कंपनीचा अनियमित विद्युत पुरवठ्याने बेजार झालेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे . बुद्धिहाळ तलावातील केबल चोरीची प्रकरण ताजे असताना वाटंबरे येथील मान नदीच्या पात्रातून पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना घडली .
या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हाता तोंडाशी आलेली पिके पाणी अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत महावितरण कंपनीचा अनियमित वीजपुरवठा व चोरट्यांच्या केबल चोरीमुळे या भागातील शेतकरी हतलब झालेला दिसून येत आहे तरी याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन यांनी लक्ष घालून केबल चोराना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


शनिवार, ६ जून, २०२६

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात विरहित कामगिरीबद्दल अण्णासाहेब जगताप पुरस्काराने सन्मानित.

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात विरहित कामगिरीबद्दल अण्णासाहेब जगताप पुरस्काराने सन्मानित. 


वाटंबरे/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अपघात विरहित चालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वाटंबरे तालुका सांगोला येथील सांगोला आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत असणारे अण्णासाहेब जगताप यांनी 25 वर्ष अपघात विरहित सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे या ठिकाणी अण्णासाहेब जगताप यांनी १९९९ साली एसटी चालक म्हणून कामास सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी १६ वर्ष विना अपघात कार्य केले नंतर ते सांगोला येथे १० वर्षे एसटीमध्ये सेवा बजावत आहेत. या २६ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एसटीच्या माध्यमातून विना अपघात प्रवाशांची सुरक्षितपणे सेवा केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये विना अपघात विरहित बॅच, प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम पंचवीस हजार व शाल श्रीफळ देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.



चौकट: यावेळी त्यांनी २६ वर्ष एसटीमध्ये सेवा बजावत असताना आलेले अनुभव कथन करताना ठाणे आगारात काम करत खंडाळा घाटातील ट्रॅफिकचे अनुभव यावेळी त्यांनी सांगितले ठाणे अक्कलकोट या बसवर चालक म्हणून त्यांना आलेले अनुभव रात्री गाडी चालवताना येणारे अनुभव तसेच आपल्या एस टी मधील प्रवाशांचा सुरक्षित प्रवास कसा होईल व तो प्रवासी गावापर्यंत कसा पोहोचला जाईल या विचाराने मी प्रेरित होऊन मी एसटीमध्ये काम करत आहे.

बुधवार, २७ मे, २०२६

सोलापूर विधान परिषदेसाठी सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा

 सोलापूर विधान परिषदेसाठी सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा


पक्षनिष्ठा आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी द्यावी : कार्यकर्त्यांची मागणी 



सांगोला वृत्तवेध :

 महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. यामध्ये सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण 3 महिला उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या, सांगोल्यातील सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये सांगोला तालुक्याला संधी मिळावी अशी मागणी प्रमुख नेतेमंडळीसह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. 

  भाजपासाठी एकतर्फी निवडणूक असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देण्याबाबत पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आता यासाठी राजश्रीताई नागणे - पाटील, रश्मीताई बागल, आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रद्धा जवंजाळ या तीन नेत्यांची नावे रेसमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर विधान परिषदेच्या 616 मतांपैकी साडेचारशे पेक्षा जास्त मते भाजप आणि मित्रांकडे असून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मतांची बेरीज केल्यास विरोधकांकडे मते शिल्लक राहत आहेत.अशावेळी महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून अजून कोणीही उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षाने सूचना दिलेल्या नाहीत. सध्या सोलापूर विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जवंजाळ आणि भाजप महिला आघाडीतील कोअर लीडर असणाऱ्या राजश्री नागणे ही तीन नावे पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आली आहेत.

   सध्या भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत आणि रणजितसिंह मोहिते पाटील, भाऊसाहेब रुपनर यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सोलापूरच्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने घेणार असल्याची माहिती आहे. अशावेळी पक्षाकडून सर्वात सेफ असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देऊन महिला आस्थण धोरण भाजप राबवित असल्याचे दाखवून द्यायचे त्यामुळेच सोलापूर विधान परिषदेसाठी महिलांना संधी देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी शिल्लक असताना अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता असल्याबाबत बोलले जात आहे. तत्पूर्वी  सांगोल्यातून राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी मिळावी अशी माफक अपेक्षा सांगोलकरांकडून केली जात आहे. त्यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच  सामाजिक कार्यातून अनेक गोरगरीब गरजूंना त्यांनी मदत केली आहे. सांगोला तालुक्यात तब्बल 30 हजार महिलांचा मेळावा घेतला, या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगोल्यातून राख्या पाठवून दिल्या. या निमित्ताने लाडक्या बहिणीचा सन्मान म्हणून साड्या वाटप केल्या, महिलांच्या अडी अडचणी जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. तालुक्यात विविध गावात रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत, शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी बसवून देण्यात आला आहे, पाण्याच्या अडचणी सोडवले आहेत. धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवले आहेत. तालुक्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेवून ती पाणी प्रश्नाचा मार्ग मोकळा केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना भरीव निधी दिला. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक समृद्ध करण्याबरोबर त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्ट ला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला,  डिजिटल शाळा करून, शाळेला पाण्याची व्यवस्था करून दिली, दुष्काळावर मात करण्यासाठी जनावरांसोबत पशुपालकांनी तब्बल 27 दिवस सांगोला तहसील समोर पाण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनातील मागण्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार मान नदीला पाणी सोडून  आंदोलन मागे घेतले. रात्री 2 वाजता देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना कॅनल वर  शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडण्याचे धाडस दाखवले, शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप केले,  यासह महापर्जन्य यज्ञ, टंचाई काळात चारा छावणी वर जाऊन पशुपालकांना स्नेहभोजन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कुंकुमार्चन कार्यक्रमातून महिलांचा सन्मान, शासकीय योजना तालुक्यातील तळागाळातील महिला पर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी दिलेले योगदान यामध्ये प्रामुख्याने संसार साहित्य वाटप करण्यामध्ये घेतलेला पुढाकार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत त्यांचा केलेला सत्कार, कोरोना काळात रुग्णांना व तालुक्यातील नागरिकांना केलेली मदत, वृद्धाश्रम व अनाथ मुलांच्या शाळेवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच अन्नधान्य वाटप, शेती व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा केलेला गुणगौरव, तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच विविध प्रशासकीय विभागातील नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, हर घर तिरंगा यावेळी शासनाच्या आदेशानुसार गावोगावी प्रसिद्धी आणि प्रचार करण्यामध्ये केलेले काम, या सह तालुक्याच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून थेट मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केली धडपड यासह सामान्य कार्यकर्त्यांना देखील सन्मानाची वागणूक आणि त्यांचे काम मार्गे लावण्यापर्यंत केलेले प्रयत्न यामुळे सांगोला तालुक्यातून त्यांच्या नावाला पसंती दर्शवली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री नेमका कोणता निर्णय घेणार आणि कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


सोमवार, २५ मे, २०२६

देवदर्शनासाठी निघालेल्या मायलेकरावर काळाचा घाला: जुनोनी येथे कार अपघातात दुर्दैवी अ़ंत.

 देवदर्शनासाठी निघालेल्या मायलेकरावर काळाचा घाला: जुनोनी येथे कार अपघातात दुर्दैवी अ़ंत.



सांगोला (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने असलेल्या पुढील कारचे टायर फुटल्याने व पाठीमागून येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने या अपघातात कारमधील दोघा माय लेकरांचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर कुटुंबातील अन्य 6 महिला, पुरुष व लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि.25 मे रोजी दु. 12 वाजणेच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील जुनोनी ता. सांगोला येथे घडली आहे.

संदिप भोसले वय 32 व रेखा भोसले वय 60 दोघेही रा. पलूस एमआयडीसी पलूस जि. सांगली अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर वेदांत भोसले वय 10, वैभव भोसले वय 12, दुर्वा भोसले वय 5, विद्या भोसले वय 36, ज्योती भोसले वय 30 हे गंभीर जखमी तर अनिल भोसले वय 36 हे किरकोळ जखमी झाले आहेत.

पलूस जि. सांगली येथील भोसले कुटूंबीय सध्या अधिक महिना सुरू असल्याने देवदर्शनासाठी मिरज सांगोला रोडवरून मारुती सुझुकी कारमधून पंढरपूर येथे निघाले होते, दरम्यान त्यांची कार जुनोनी ता. सांगोला जवळील बायपास जवळ आली असता त्यांच्या कार च्या पुढे असणाऱ्या कारचे टायर फुटला व दुसऱ्या लेनवरील भोसले यांच्या ताब्यातील असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने मारुती सुझुकी कार डिव्हायडरला धडकून दोन, तीन पलटी मारल्याने कारमधील संदीप भोसले व रेखा भोसले या माय लेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर वेदांत भोसले, वैभव भोसले, दुर्वा भोसले, विद्या भोसले, ज्योती भोसले हे गंभीर जखमी तर अनिल भोसले हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे, याबाबत सांगोला पोलिसांत नोंद झाली नव्हती.




रविवार, २४ मे, २०२६

पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे :पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन

 पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे :पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन



वाटंबरे/ प्रतिनिधी -
पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून, प्रत्येक गावातील माहिती वेळोवेळी पोलीस स्टेशनला सांगणे गरजेचे आहे व पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे असे मत नूतन पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी नाझरे दूरक्षेत्र कार्यालयात सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असून, मी नाझरे पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालो व पोलीस पाटलांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत व आभार मानतो असेही पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांची आढावा बैठक घेतली.
सदर प्रसंगी पोलीस नाईक सुजित जाधव, पो.हे. कॉन्स्टेबल संजय भानवसे, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, संतोष भडंगे,  सीता देवी पाटील, पांडुरंग पवार, वनिता कोकरे, रामचंद्र चौगुले, विकास आदाटे, संध्या नलवडे, गोपाळ जाधव, मंगेश जंवजाळ, विजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे इ. उपस्थित होते. शेवटी पोलीस नाईक सुजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.



रविवार, १७ मे, २०२६

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे : येथील साठे नगर परिसरातील वळण रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी सांगोला या मुख्य रस्त्यावर साठे नगर परीसर येत असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वीही काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart