Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार



बार्शी /प्रतिनिधी:

पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) पाटील यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल बार्शीतील पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देऊन दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेत, मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने व आश्रयाने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या करिअर घडविण्यासाठी शैक्षणिक सहाय्य तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य सुदृढ राहणे अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्परतेने मदतीचा हात देणे ही दुर्मीळ बाब आहे. आर्थिक मदतीसोबतच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख अधिक दृढ झाली आहे. बार्शीतील या सत्कार सोहळ्याने पत्रकार बांधवांच्या एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित केला. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सत्कार प्रसंगी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 समर्थ संस्थेमार्फत भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 



वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाटंबरे येथे 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.    

              या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त/दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853 व भाग्यवान पवार 9561546144 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.



सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांची निवड अभिमानास्पद - अध्यक्ष रविराज शेटे*

 *सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांची निवड अभिमानास्पद - अध्यक्ष रविराज शेटे*


 

सांगोला प्रतिनिधी 

        अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली व यामध्ये अध्यक्षपदी राजाभाऊ माने, प्रदेश महासचिव पदी विकास भोसले यांची निवड झाली परंतु  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोल्याचे संपादक सतीश भाऊ सावंत यांची व उपाध्यक्षपदी संपादक चांद भैया शेख यांची निवड होणे म्हणजे सांगोल्याच्या दृष्टीने अभिमानाची आहे व दोघांची निवड म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगोला तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगोला येथे दोघांच्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. 

       सावंत व शेख यांच्या दोघांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांनी योग्य न्याय व सन्मान दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांनी संघटना वाढीसाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करू असे सत्कार प्रसंगी सांगितले. 

      यावेळी उपाध्यक्ष सचिन धांडोरे, सचिव दत्तात्रय पवार, सदस्य विनोद चंदनशिवे, करण मोरे, समाधान धांडोरे, सचिन कुंभार, सुनील पवार, समाधान गंगणे, कृष्णदेव इंगोले, मा. सरपंच संतोष पाटील इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन दांडोरी यांनी तर सर्वांच्या आभार दत्तात्रय पवार यांनी मानले.


रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने*

 *अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने* 


 *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले*



 कोल्हापूर/ प्रतिनिधी 

 अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

    यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 

(निवडीनंतर नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडीनंतर संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न तोळमापीचा प्रश्न यास अन्य प्रश्नावर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू माझ्यावर जोश विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पत्रकारांच संघटन बळकट करू असा विश्वास सतीश सावंत यांनी उपस्थित पत्रकारांना दिला)

 


निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

 “निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

पराभवानंतरही जनतेच्या दारी!”* 


 *ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटातील 13 गावांत जाऊन मतदारांचे मानले आभार.......* 


सांगोला तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटातून युवा नेते ॲड. सूर्यादित्य उर्फ यशराजे दीपकराव साळुंखे पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी जनतेच्या भेटीगाठींचा दौरा सुरू करत, “निवडणूक ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेचे साधन आहे,” हा संदेश कृतीतून दिला.

जवळा जिल्हा परिषद गटातील संगेवाडी, मांजरी, बामणी, मेथवडे, सावे, राजापूर, वाढेगाव, देवळे, मेडशिंगी, आलेगाव, वाकी-घेरडी, वाणीचिंचाळे व जवळा अशा एकूण १३ गावांमध्ये जाऊन त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधत, “पराभव झाला म्हणून घरात बसणार नाही; तुमच्या सुख-दुःखात कायम उभा राहीन,” असा शब्द दिला.

या आभार दौऱ्यात वाढेगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सौ. वंदना भरत शेळके तसेच जवळा पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या आलेल्या सौ. पुनम सुदर्शन इंगवले यांनीही विविध गावांमध्ये उपस्थित राहून मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. दोन्ही मान्यवरांनी “जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करून दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत आगामी काळातही एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “गत निवडणुकीत आपण जनतेसमोर जी वचने दिली होती, ती कामाच्या स्वरूपात पूर्ण करण्याचा प्रयत्न यापुढेही जोमाने सुरू राहील. झालेला पराभव विसरून आपण विकासाच्या दिशेने एकत्र वाटचाल करूया.”

या निवडणुकीत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सांगितले, “यशाने यंदा हुलकावणी दिली असली तरी अपयशाने मी खचणार नाही. आमच्या साळुंखे पाटील कुटुंबाच्या रक्तातच जनसेवा आहे. लोकसेवेची बांधिलकी भविष्यातही तेवढ्याच ताकदीने जपणार आहे.”

या आभार दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या आवाजात जिद्द दिसून आली. “कार्यकर्त्यांच्या भावना हीच माझी खरी शिदोरी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


तसेच आजपासून संपूर्ण जवळा गटासह सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात तरुणांशी संवाद साधून तरुणांची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पराभवाच्या सावटातही सेवाभाव, जिद्द आणि जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा निर्धार व्यक्त करत ॲड.यशराजे साळुंखे पाटील यांनी आगामी काळातही लोकहितासाठी अविरत कार्यरत राहण्याचा शब्द दिला.




शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

हिंदुस्तान फीड्स , पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्य व सॅनिटायझर पॅडचे वाटप.

 हिंदुस्तान फीड्स , पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्य व सॅनिटायझर पॅडचे वाटप.



वाटंबरे/प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे येथे हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत शुक्रवार दि.13 फेब्रुवारी रोजी शालेय साहित्य व मुलींसाठी सॅनिटायझर पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार यांनी आपल्या मनोगतातून  हिंदुस्तान फीड्स व पवार उद्योग समूहाने  राबविलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


यावेळी   हिंदुस्तान फीड्स चे निलेश इंगळे यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनीच्या वतीने चालू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून  माहिती दिली यावेळी मधुकर पवार, दत्तात्रय पवार यांनी हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी  पवार उद्योग समूहाचे  मोहन पवार, सुभाष पवार ,ज्योतीराम आवताडे ,प्रवीण पवार, महेश इंगळे, नंदकुमार गायकवाड,शिवराज पवार, नवनाथ पवार, पर्यवेक्षक रमेश शिवशरण, खंडागळे सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था

  

          *मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था*



         उद्या दिनांक 09/02/ 2026 रोजी मतमोजणी   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून पोस्टल मतदान मतमोजणी 3 टेबलवर स्वतंत्र ठेवलेली असून,  मतमोजणी अगोदर होईल त्यानंतर 20 टेबल ईव्हीएम द्वारे झालेल्या मतांची मतमोजणी होणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी 8:00 वाजता कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मत मोजणी करण्या अगोदर पोस्टल मतमोजणी होईल त्यानंतर 20 टेबल वरती 1)पहिली फेरी  सकाळी 10:00 :वाजता सुरू करण्यात येईल मतमोजणी  पहिले दोन फेऱ्या जिल्हा परिषद महुद गट व गणाची सुरू होईल

 2) तिसरी व चौथी फेरी

 एकतपुर गट व  गणाची होईल 3) त्यानंतर नंतर पाचवी, सहावी  व सातवी फेरी जवळा गट व  गणाची मतमोजणी होईल 4)त्यानंतर  आठवी, नववी व दहावी फेरी कडलास गट व गणाची होईल 5) त्यानंतर  अकरावी व बारावी फेरी चोपडी गट व गणाची होय

6) त्यानंतर  13, 14 व 15 वी फेरी कोळा गट व गणाची होईल 

7)त्यानंतर  16 ,17  व 18 वी फेरी घेरडी गट व गणाची होईल.   

                वरील प्रमाणे मतमोजणी 20 टेबलवर असून एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून एकूण 140 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे तसेच.  

         मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उमेदवाराचे प्रतिनिधी ,माध्यम प्रतिनिधी यांना नियमानुसार प्रवेश  देण्यात येणार आहे संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर काटेकोर लक्ष राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली आहे


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart