Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

रविवार, २८ जून, २०२६

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.



वाटंबरे/ प्रतिनिधी:
सांगोला राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्यानी मंदिरामध्ये लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची विटंबना करत दीड किलोचा मुकुट, मनी मंगळसूत्र तसेच काही ऐवज लंपास केला  या  चोरीच्या घटनेने पूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ माजली होती.या चोरीच्या संदर्भात राजुरी ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्यात आले होते तसे या चोरीचा लवकर तपास न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची प्रशासनास ग्रामस्थांच्या वतीने इशारा देण्यात आला होता.  आ. बाबासाहेब देशमुख यांनी काल रविवार दि. २८ जून रोजी दुपारी तीन वाजता राजुरी येथे भेट देत या चोरीच्या संदर्भातील सर्व माहिती  ग्रामस्थांकडून घेतली यावेळी ग्रामस्थांकडून चोरीचा संथ गतीने चालू असलेला तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली . यावेळी त्यांनी पोलीस प्रशासना बरोबर चर्चा करून या चोरीचा तात्काळ तपास  करत चोरट्यांना  अटक करण्यात येईल  असे आश्वासन बैठकीत ग्रामस्थांना दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर राजुरी ग्रामस्थ   उपस्थित होते .
जे

नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न

 नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती  चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न 


“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश; प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन



सांगोला, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी उपस्थित पालक व नागरिकांना मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. पोलिओ हा लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील दोन थेंब आवर्जून पाजावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येक पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.



या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती उपसभापती श्री. अजय सरगर, सांगोला पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओंकार कोरे, श्री. संजय शेळके, श्री. भालचंद्र भंडारे, श्री. रमेश पाटील, श्री. नामदेव आलदर, श्री. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. जिलानी काझी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!” असा निर्धार व्यक्त केला.


शनिवार, २७ जून, २०२६

चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश

चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश 
* अभिषेक चौगुले याने 99.32 % गुण मिळवून चोपडी गावचे नाव केले उज्वल
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याने महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी सीईटी  2025-26 परीक्षेत सुयश 99.32 टक्के गुण मिळवून चोपडी गावचा लौकिक वाढवला आहे. अभिषेक चौगुले याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी अभिषेकच्या यशाबद्दल त्याचा सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
अभिषेक चौगुले याला दहावीमध्ये 94.40 टक्के गुण मिळाले होते. तसेच बारावीमध्ये 80.33 गुण मिळाले आहेत. अभिषेक चौगुले हा पुढील शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयातून computer science या शाखेतून पूर्ण करणार असल्याचे त्याचे पालक अनिल चौगुले यांनी सांगितले आहे.

बुधवार, २४ जून, २०२६

अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू

 अति मद्यप्राशन केलेल्या ७० वर्षीय इसमाचा वाटंबरे येथे मृत्यू




वाटंबरे/प्रतिनिधी -अति मद्य प्राशन केलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमास नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.ही घटना काल बुधवार २४ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वाटंबरे ता. सांगोला येथील उबराव मिसाळ यांच्या व्यापारी संकुल समोर

घडली.उत्तम दामोदर नकाते ( वय -७०, रा.अकोला ता सांगोला ) असे मृताचे नाव आहे 

याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा साळे यांनी खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाटंबरे ग्रामस्थ गेल्या ४ वर्षापासून गावात अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत अवैध विक्री व्यवसाय बंद होण्याऐवजी  जोमाने सुरू आहे दरम्यान काल सोमवार काल सोमवार २४ जून रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथील उत्तम नकाते या वृद्धाने अति मद्यप्राशन केल्याने तो जागीच बेशुद्ध होवून पडला होता या घटनेची माहिती सरपंच नामदेव पवार यांनी पोलीस स्टेशन  , तहसीलदार यांना दिल्याने तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे , राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी पंकज कुमार व गडदे यांनी तात्काळ वाटंबरे गावात भेट दिली असता पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी पुतण्या नितीन नकाते यांनी उत्तम नकाते यांना बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे करीत आहेत.


 (राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन वाटंबरे गावात अवैद्य रित्या देशी विदेशी दारू विक्रीत्यावर कारवाई करत  ३२ हजार रुपयेची देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला.)


शुक्रवार, १९ जून, २०२६

खंडोबा देवस्थान रस्त्यावरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी

 खंडोबा देवस्थान रस्त्यावरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी



वाटंबरे, ता. सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री जागृत खंडोबा देवस्थानाच्या पूर्व द्वाराजवळ, पिंपरी मळ्यालगत रस्त्याच्या कडेला असलेली विहीर सध्या धोकादायक अवस्थेत असून या विहिरीला तातडीने संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सदर विहीर  चिलारीने वेढलेली असली तरी ती जीर्ण व अपुरी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज वाहनचालक, प्रवासी, नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. याशिवाय श्री खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही सतत वर्दळ असते. त्यामुळे विहिरीच्या परिसरात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात विहिरीचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विहिरीभोवती मजबूत संरक्षण कठडे उभारावेत व आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.






बुधवार, १७ जून, २०२६

नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

 नारायण पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. 



सांगोल तालुका उदनवाडी येथील श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या प्रशालेतील सहशिक्षक नारायण पवार यांना मुंबई येथे १४ जून रोजी बी दी चेंज फाउंडेशन यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात केला.

 यावेळी नारायण पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या पुरस्कार वितरण सोहळ्यात  सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार IAS सुमित रेवरी , डेप्युटी कमिशनर GST नंदकुमार दिघे,ACP रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री निवेदिता पगार तसेच अमृत रोहोम , मयूर ढोकळे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर ईतर मान्यवर उपस्थित होते. 

नारायण पवार सर यांचे मूळ गाव वाटंबरे व ते शिक्षक म्हणून उदनवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. वाटंबरे ग्रामस्थ तसेच उदनवाडी प्रशालेतून व  ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.


रविवार, १४ जून, २०२६

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.

वाटंबरे मान नदीपात्रातून विद्युत मोटरच्या केबलांची चोरी.




महावितरण कंपनीचा अनियमित विद्युत पुरवठ्याने बेजार झालेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे . बुद्धिहाळ तलावातील केबल चोरीची प्रकरण ताजे असताना वाटंबरे येथील मान नदीच्या पात्रातून पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना घडली .
या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हाता तोंडाशी आलेली पिके पाणी अभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत महावितरण कंपनीचा अनियमित वीजपुरवठा व चोरट्यांच्या केबल चोरीमुळे या भागातील शेतकरी हतलब झालेला दिसून येत आहे तरी याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन यांनी लक्ष घालून केबल चोराना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart