Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था

  

          *मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था*



         उद्या दिनांक 09/02/ 2026 रोजी मतमोजणी   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून पोस्टल मतदान मतमोजणी 3 टेबलवर स्वतंत्र ठेवलेली असून,  मतमोजणी अगोदर होईल त्यानंतर 20 टेबल ईव्हीएम द्वारे झालेल्या मतांची मतमोजणी होणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी 8:00 वाजता कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मत मोजणी करण्या अगोदर पोस्टल मतमोजणी होईल त्यानंतर 20 टेबल वरती 1)पहिली फेरी  सकाळी 10:00 :वाजता सुरू करण्यात येईल मतमोजणी  पहिले दोन फेऱ्या जिल्हा परिषद महुद गट व गणाची सुरू होईल

 2) तिसरी व चौथी फेरी

 एकतपुर गट व  गणाची होईल 3) त्यानंतर नंतर पाचवी, सहावी  व सातवी फेरी जवळा गट व  गणाची मतमोजणी होईल 4)त्यानंतर  आठवी, नववी व दहावी फेरी कडलास गट व गणाची होईल 5) त्यानंतर  अकरावी व बारावी फेरी चोपडी गट व गणाची होय

6) त्यानंतर  13, 14 व 15 वी फेरी कोळा गट व गणाची होईल 

7)त्यानंतर  16 ,17  व 18 वी फेरी घेरडी गट व गणाची होईल.   

                वरील प्रमाणे मतमोजणी 20 टेबलवर असून एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून एकूण 140 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे तसेच.  

         मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उमेदवाराचे प्रतिनिधी ,माध्यम प्रतिनिधी यांना नियमानुसार प्रवेश  देण्यात येणार आहे संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर काटेकोर लक्ष राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली आहे


शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य मतदान पेटीत बंद 70% टक्के मतदान झाले*


        *जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य मतदान पेटीत बंद 70% टक्के मतदान झाले*    


               आज दिनांक 07/02/2026 रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तालुक्यातून 32 क्षेत्रिय अधिकारी सकाळी 6:00 वाजल्यापासून 274 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून आज दिवसभर सतत भेटी देऊन अडचणीचे निराकरण करणे, मॉक पोल अहवाल सादर करणे, सुरुवातीला काही केंद्रावर मॉकपोल पूर्वी बॅलेट युनिट  बदलून दिल्याने कोठेही अडचण निर्माण झाल्या नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले 

        या निवडणुकीत जि प साठी 129 व पंचायत समितीसाठी 178 उमेदवार रिंगणात उभे होते त्यांच्या साठी 1,83,662 इतक्या मतदारांनी मतदान केले

पुरुष मतदार=  94972 स्त्री मतदार = 88414 इतर मतदार=2  एकूण मतदार=1,83,662

 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण 70% झाले असून मतदाना ची आकडेवारी घेण्यासाठी  नियंत्रण कक्षात 10 टेबल ठेवले होते त्या ठिकाणी संगणक तज्ञ व नियंत्रित अधिकारी बाळासाहेब मोरे प्रभारी नायब तहसीलदार, तसेच पथक प्रमुख सचिन कुंभार सहाय्यक महसूल अधिकारी, आकाश गोडसे, समाधान वाघमोडे सर, अमोल देशमुख सर, अण्णासो सरगर, आर एन टी सुनील बेलभंडारे, सोमनाथ साळुंखे हे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांचे नियंत्रणात कामकाज करीत असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले 

       सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार व तरुण मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले बरेच लोक दूरगांवी व कामानिमित्त नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर दिसून आले आणि त्यांच्यासाठी प्रशासनाने सुरक्षा पोलीस बंदोबस्त  मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला तालुका पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी  तसेच आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप देवकते यांनी वैद्यकीय सुविधा 274 केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक, सहाय्यिका , आशाताई व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात दिसून आले, ग्रामपंचायत अधिकारी,  महसूल अधिकारी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील  बी एल ओ क्षेत्रिय अधिकारी आणि *आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला* या सर्वांनी सकाळपासून खूप कष्ट घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले आहे व सर्वांचे प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानले आहे तसेच तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे


बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील

 विकासाच्या मुद्द्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील



चोपडी गटात परिवर्तनाची चाहूल; चेतनसिंह केदार सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांत विकास कामांचा ठसा उमटलेला असून शेती, पाणी, रस्ते व वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णायक काम झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीतून साध्य करायचा असेल तर महायुतीला साथ देणे काळाची गरज आहे, असे ठाम मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

      चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


      यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. विविध जलसिंचन योजना, कालवे व पाणी साठवण प्रकल्पांमुळे बागायती शेतीचे प्रमाण वाढले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. ग्रामीण रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीजपुरवठा व डीपीचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचणी येत नाहीत. हाच विकासाचा धागा जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तेथेही महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत आणि राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. सदाशिव दबडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

      यावेळी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आल्यास पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. विकासाचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच महायुतीचे धोरण आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपला निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रचार सभेला सरपंच बंडू बाबर, तानाजी बाबर, विश्वनाथ आप्पा बाबर, दादासाहेब बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला स्पष्ट पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला.


मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


 ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल - माजी आमदार शहाजीबापू पाटील


शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन जनतेसमोर - चेतनसिंह केदार सावंत 


सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीला पाठिंबा देणे काळाची गरज आहे. गावागावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न. सोडवण्याचे काम महायुतीच करू शकते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असून या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेआहे. ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या माध्यमातूनच गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.

     


  महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर, राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ.सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ उदनवाडी, चोपडी, पाचेगाव, बलवडी येथे प्रचार सभा घेण्यात आली. 

        यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, “महायुतीचे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे वेगाने मार्गी लावली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक सामान्य कुटुंबाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न महायुतीने पाहिले आहे, आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत,” अशी ठाम भूमिका चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी महायुतीच्या वतीने जनसंवादाच्या माध्यमातून मांडली.

       यावेळी पाचेगाव येथील सरपंच संगीता संजय भोसले, निवृत्ती मिसाळ गुरुजी, गोरख भोसले, संजय भोसले, तानाजी मिसाळ , आण्णासो पाटील, आबासो पाटील, दत्तात्रय मिसाळ, भारत मिसाळ, पोपट घुले, दुर्योधन घुले, भारत चव्हाण, तात्यासो मिसाळ, महेश गुरव, चोपडी येथील सरपंच श्रीमंत सरगर, उपसरपंच पॉपटशेठ यादव, दगडू बाबर, आर.एस.बाबर सर, सुरेश बाबर, अनिल चौगुले, मेजर अमोल बाबर, विनायक बाबर, बंडू मेखले, ॲड .शरद यादव, लक्ष्मण चौगुले, पोपट बाबर, विठ्ठल जरग, बाळासो बाबर, सचिन खळगे, सुरेश जाधव, बलवडी येथील मारुती शिंदे, महादेव शिंदे, दत्तात्रय निंबाळकर, साहेबराव शिंदे, विनायक शेंबडे, जैनुद्दीन शेख, जुबेर मुजावर, प्रशांत वलेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

सांगोला : कडलास जिल्हा परिषद गटात योगेश ( दादा ) खटकाळें ची जोरदार चर्चा; युवा नेतृत्वाकडे मतदारांचा ओढ*

 ♦️ *सांगोला : कडलास जिल्हा परिषद गटात योगेश ( दादा ) खटकाळें ची जोरदार चर्चा; युवा नेतृत्वाकडे मतदारांचा ओढ* 




सांगोला ( सुभाष येलपले ) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

विशेषतः कडलास जिल्हा परिषद गटात सध्या योगेश (दादा) खटकाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगत असून, सोशल मीडियापासून ते गावच्या चावडीपर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक सूर उमटताना दिसत आहेत.

लोकविकासाचा नवा चेहरा

कडलास गटात गेल्या काही काळापासून विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये संमिश्र भावना आहेत. अशा परिस्थितीत, योगेश खटकाळे यांनी सातत्याने जनसंपर्क वाढवून लोकांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे *. "लोकांचा विश्वास हाच आमचा विजय,"* असे म्हणत खटकाळे यांनी विकासाच्या रूपाने मतदारांना साद घातली आहे.

कडलास गटातील राजकीय समीकरणे


 *युवा शक्तीचा पाठिंबा* :


 खटकाळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि तडफदार नेतृत्व समोर येत असल्याने तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे.


 *गावगाड्याशी नाळ:*


 कडलास गटातील विविध गावांमध्ये त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम आणि थेट संवाद यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळत आहे.


 *परिवर्तनाची लाट:* 


स्थानिक पातळीवर *"बदल हवा"* अशी भावना असलेल्या मतदारांचा कल खटकाळे यांच्याकडे झुकताना दिसत आहे.

निवडणुकीची उत्सुकता वाढली

सांगोल्याच्या राजकारणात नेहमीच चुरस पाहायला मिळते. या वेळेस कडलास गटातून योगेश खटकाळे मैदानात उतरले आहेत. चर्चेनुसार प्रस्थापित नेत्यांच्या गटात ही हालचाली वाढल्या आहेत.

महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने  स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे.

विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या व�



कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासूद गावातून मताधिक्य देवू : उपसरपंच अनिल केदार.

 कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासूद गावातून मताधिक्य देवू : उपसरपंच अनिल केदार.

*श्री हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ ,



सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वासुद गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल केदार म्हणाले, वासुद गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करु.

यावेळी सुनील भोरे सर म्हणाले, वासूद गावातून मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना कायम  बहुमत दिले आहे. त्याप्रमाणे कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोला तालुक्याला  निधी कमी पडणार नाही. आपले कोणतेही काम भविष्यात आडणार नाही. त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वासूद गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देवू असा निर्धार व्यक्त केला.





यावेळी मा. जि. प .सदस्य अशोकभाऊ शिंदे म्हणाले 2012 साली मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभारलो होतो. त्यावेळी द वासूद गावाने मताधिक्य दिले होते. यावेळी वासुद गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, वासूद येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला असल्याबद्दल आभार व्यक्त करीत कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो. मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.यावेळी माजी सरपंच अरुण केदार यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी उमेदवार शोभाताई खटकाळे, उमेदवार राणीताई पाटील, उद्योगपती सौदागर केदार,  विष्णुपंत केदार, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उपसरपंच बंडू केदार, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सागरदादा पाटील, संजय केदार,चेअरमन अनिल खटकाळे, धर्मराज केदार, जगन्नाथ केदार ,भागवत शिंदे, महादेव शिंदे, उपसरपंच रजाक मुलाणी, अनिकेत सुरवसे ,नितीन चंदनशिवे, दिगंबर शिंदे, चेतन खटकाळे, विकास केदार, साहिल शिंदे ,विशाल खटके ,रोहन शिंदे ,यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

 जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

वाढेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ; वाढेगावच्या कॉर्नर सभेत जनसागर उसळला



सांगोला प्रतिनिधी:

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक प्रचार शुभारंभाने संपूर्ण जवळा गटात निवडणुकीचे वातावरण अक्षरशः तापले असून महायुतीच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.

या निमित्ताने जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वाढेगाव येथे जोरदार कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे उत्साहात पार पडला. या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

या वेळी जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त वाढेगाव येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिला.


कॉर्नर सभेत उमेदवारांनी विकास, जनतेच्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका मांडली. “जवळा गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरू,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सभेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून रस्ते, चौक आणि गल्लीगल्लीतून कार्यकर्त्यांची व समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती.

सभेत महायुतीच्या सर्व प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जवळा गटाचा विकास हाच आमचा अजेंडा असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरू,” असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

घड्याळाच्या चिन्हाचा जयघोष, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता, जवळा गटात महायुतीने निवडणूक लढाईत आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून मिळाले. प्रचाराचा हा भव्य शुभारंभ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart