Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन*

 


*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन*


 *गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कला अकादमी येथे होणार उद्घाटन* 


 


  देशातील सर्वात मोठी डिजिटल मीडियातील संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १०  ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न होणार असून या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, स्वागताध्यक्ष गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोवा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री रमेश तवडकर,  कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,अध्यक्ष आयुष्यभान भारत योजना महाराष्ट्र  ओमप्रकाश शेटे , गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,खासदार सदानंद शेठ तानावडे, चंदगड चे आमदार शिवाजी पाटील, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ  यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष राजा माने व संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व राज्य सचिव विकास भोसले  यांनी दिली.

   या पत्रकार परिषदेला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत,राज्य उपाध्यक्ष संजय भैरे,मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख,राज्य संघटक मयूर गलांडे यांची उपस्थिती होती.

        डिजिटल मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, तेलंगाना,आंध्र प्रदेश,पंजाब, दिल्ली या राज्यातून हजारो संपादक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

     या महाअधिवेशनात  महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत  संपादक व मध्यम तज्ञ राजा माने हे घेणार असून यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराची घोषणा राजा माने यांनी केली.

      महा अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून  ऍड. संदीप कायदे (पंढरपूर )यांचे ’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ऍड.नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांचे ’समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा’...,सौमित्र देसाई, पूणे यांचे AI चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर   या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडियातील विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे ठराव यावर चर्चा करून अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे.

  पणजी गोवा येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, या महाधिवेशनाचा फायदा देशभरातील डिजिटल मीडियातील  संपादक पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने होईल  असा विश्वास यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.




 *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय वतीने पुरस्कारांची घोषणा*


 राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त मान्यवर 


 

1) श्री. कमलाकांत तारी,(गोवा ) गोवंश

 संवर्धक 


2) डॉ. महुवा शाह,(गोवा )

 शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी 


3) आमदार निलेश राणे , कुडाळ (विधिमंडळ उत्कृष्ट कार्य )



4)श्री. कमलेश बांदेकर, (गोवा )

योग प्रसारक


5)श्री दीपक नार्वेकर,(गोवा )

 उत्कृष्ट प्रशासन 


6)श्री. गुरुप्रसाद पावसकर, (गोवा )

आयुक्त, दिव्यांग संचालनालय


7) सौ. नेहा आंग्रे,गावस, (गोवा )

समाजसेवा 


8) मा.प्रकाश कुलकर्णी,मुंबई ( कृषी )


9)मा. माणिक तुकाराम शेडगे  सातारा ( सामाजिक कार्य )


10) मा. सौ.चित्राताई क्षीरसागर ,गोवा ( कवयित्री व साहित्यिक )


11) मा.निलेश भगवान सांबरे पालघर ( ग्रामसेवा )


12) प्रा. विशाल गरड,बार्शी ( प्रबोधन )


 13)सौ. राधा उत्तरेश्वर खताळ, वडवणी बीड( कार्यक्षम सरपंच )


14)मा. गोवर्धन दराडे ,बीड ( अनाथ संगोपन )


15)मा. संतोष ठोंबरे , बार्शी  ( उद्योग)


16) मा. पद्मज गुप्ता, नागपुर ( गो सेवा )


17) मा.राकेश अग्रवाल , मुंबई ( सामाजिक )


18) मा. राजेंद्र पाठक ,मुंबई ( बाल मदत )


19) मा. विकास देशमुख , मुंबई ( आरोग्य सेवा)


20) ग्रामविकास नागझरी 

( जलसंधारण व ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कार )


रविवार, २६ एप्रिल, २०२६

सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी श्री. बाळासाहेब सावंत यांची निवड* *कार्यकर्तृत्वाला मिळाला सन्मान**

 *सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी श्री. बाळासाहेब सावंत यांची निवड* *कार्यकर्तृत्वाला मिळाला सन्मान**


पंढरपूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जिल्हा सोलापूर (मुख्यालय पंढरपूर) या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सचिवपदी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब भीमराव सावंत यांची निवड करण्यात आली आहे. चेअरमनपदी श्री. चंद्रकांत जाधव, तर व्हॉईस चेअरमनपदी श्री. प्रशांत धावणे यांची निवड झाली आहे.

सोलापूर जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेची स्वतःची सुमारे पाच गुंठ्यांवर उभारलेली दहा हजार चौरस फुटांची प्रशस्त इमारत आहे. संस्थेचे एकूण ६६२ सभासद असून, भागभांडवल सुमारे १५ कोटी रुपये आहे. संस्थेकडे ठेवी मोठ्या प्रमाणात जमा होत असून, सभासदांना सुलभ व जलद कर्जवाटप ही संस्थेची खास ओळख आहे. दरवर्षी नफ्यातून सुमारे ७.५ टक्के लाभांश (डिव्हिडंड) देत संस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे.

नूतन सचिव म्हणून निवड झालेल्या श्री. बाळासाहेब सावंत हे केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. अत्यंत साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध घटकांना एकत्र आणून काम उभे करण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांच्या वासुद गावातील वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन चळवळीत त्यांनी दिलेले योगदान विशेष दखलपात्र आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी उभारलेल्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये हरित चळवळीला चालना मिळाली आहे. गावकरी, शेतकरी, कामगार, नोकरवर्ग, उद्योगपती तसेच विविध पदाधिकाऱ्यांकडून निधी उभारणीची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वृक्षलागवडीसाठी निधी उभारणीला नवे बळ मिळाले असून, अनेक ठिकाणी हरित परिवर्तनाची नवी दिशा मिळाली आहे.

श्री. सावंत यांची प्रभावी संवादकला आणि फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून उपक्रमांचे सादरीकरण करण्याची शैली ही त्यांच्या कार्याची वेगळी ओळख ठरली आहे. त्यांच्या जिवंत, उत्साही आणि प्रभावी कमेंट्रीमुळे सामाजिक उपक्रमांना व्यापक प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ते आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करतात, ही त्यांची खास जमेची बाजू आहे.

वासुद गावापुरते मर्यादित न राहता, सोलापूर जिल्हा तसेच आसपासच्या परिसरात त्यांचा व्यापक संपर्क व प्रभाव आहे. विविध स्तरांवरील लोकांशी असलेले त्यांचे सुसंवाद आणि समन्वय कौशल्य यामुळे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम भविष्यात अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

नूतन सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी भागभांडवल वाढविणे, कर्ज मर्यादा वाढविणे, कर्जावरील व्याजदर कमी करणे तसेच विशेष मोहीम उभारून संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सभासदांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा देण्यावर त्यांचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. बाळासाहेब सावंत यांच्या या निवडीमुळे त्यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. .


मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी

 उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी 



सांगोला/ प्रतिनिधी: (दशरथ बाबर ) सांगोला तालुक्यातील चोपडी -बंडगरवाडी येथील प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी नवनाथ पोपट बाबर यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केली असून संशोधक दृष्टीकोणामुळे अल्पावधीतच नावारूपाला येत आहेत. नवनाथ बाबर यांना एकूण १२ एकर शेती क्षेत्र असून २ एकर क्षेत्रावर आंब्याची बाग, ५०० झाडांची डाळिंब बाग व ४००झाडांची सीताफळाची बाग त्यांच्या शेतामध्ये आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या २ एकर क्षेत्रात आंब्याची लागवड केली आहे. ६०० आंबा झाडांपैकी सध्या ४५० झाडावरती आंबा बहरला आहे. आंबा उत्पादन घेत असताना त्यांनी आंबा झाडावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची कलमे बांधली आहेत. त्यांनी आंबा बागेत एका झाडावरती साधारण वीस प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग राबवला आहे .दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या आंबा झाडावरती प्रचंड प्रमाणात मोहर आला होता .परंतु निसर्गाच्या  अवकृपेमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे . या आंब्यासाठी सेंद्रिय खते व औषधे यांचा वापर करण्यात आला आहे. कमी पाण्यावरती कमी खर्चात आंबा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. त्यांना शेती उत्पादनासाठी त्यांच्या कुटुंबाची साथ 

मिळत आहे. 


 नवनाथ बाबर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आंबा लागवडीनंतर पाच वर्षापर्यंत आंब्याच्या झाडांना चांगले जोपासले पाहिजे. नवनाथ बाबर व आंबा उत्पादक मित्र परिवाराने महाकेशर फार्मर कंपनी नावाने ७०००आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आहे. तसेच यामधून  निवडक ९ शेतकऱ्यांचा माणदेश महाकेशर आंबा ग्रुप तयार करण्यात आला आहे. महाकेशर फार्मर कंपनीचे सर्वेसर्वा नारायण पाटील सर संभाजीनगर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या आंबा बागेसाठी केमिकल विरहित, ऑरगॅनिक खते- औषधे यांचा वापर केला आहे. ४५० झाडातून साधारण पाच टनांचे उत्पादन अपेक्षित असून आंबा विक्रीचे व्यवस्थापन स्वतः नवनाथ बाबर हे करणार आहेत. शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची विक्री व्यवस्था तयार करण्यात येणार असून ग्राहकांना थेट केमिकल विरहीत दर्जेदार आंबा खायला मिळावा या दृष्टीने त्यांचा व ग्रुपचा प्रयत्न आहे.  त्यांच्या आंबा बागेस पत्रकार दशरथ बाबर व प्रगतशील शेतकरी सिद्धनाथ गुरव यांनी भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.



चौकट :

 ४५० आंब्याच्या झाडातून सुमारे ५ टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. आंब्याच्या बागेत सध्या हापूस, केशर, सोनपरी ,रत्ना, मियाझाकी, ब्लॅक कस्तुरी, बदामी, ॲप्पल मॅंगो, दशेरी पिठुळी, सिंधू, बनाना मॅंगो, खोबरी आंबा, रूमानी, एटीएम (वर्षभर आंबा) तोतापुरी, शेपू, वनराज, टोमॅटकीन आदी विविध प्रकारच्या व्हरायटी आंबा बागेमध्ये आहेत. येत्या आठ दिवसात आंबा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान स्वतः कलमे बांधून तयार केलेल्या आंब्याची नर्सरी सुरू करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांना अल्प किमतीमध्ये विविध प्रकारची दर्जेदार आंबा रोपे उपलब्ध करून शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल. ---

नवनाथ पोपट बाबर, प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी (चोपडी- बंडगरवाडी) अधिक माहितीसाठी संपर्क :- मो.नं.९९२२१४६६२६


सोमवार, २० एप्रिल, २०२६

सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

 सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात 



पुणे:- सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे 2024-25 या सालाकरिता गरजू मुलामुलींना उच्च शिक्षणाकरिता मदत करण्यात आली. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनांतर्गत 22 हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शैक्षणिक प्रगती चांगली असून पण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मुख्यत्वेकरून ज्या मुलांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छप्पर हरविलेले आहे, या व अशा अनेक कारणांमुळे त्यांचं शिक्षण थांबू नये व त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कोणतेही आर्थिक दडपण न ठेवता शिक्षण घेता यावे हा या मदतीमागचा मुख्य उद्देश होता.


मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन 



सांगोला प्रतिनिधी :सांगोला शहरातील एसटी स्टँड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व सावंतवस्ती येथील रहिवाशी पांडुरंग लक्ष्मण सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय61 वर्षे होते 

त्यांच्या पश्चात आई ,बहिणी,पत्नी, एक मुलगा ,दोन मुली, भाऊ ,भाऊजय, पुतणे असा मोठा परिवार होता त्यांचेवर सावंतवस्ती येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सावंत वस्ती येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले


🎤 KHABARDAR NEWS 

✨ आवाज जनतेचा ✨

━━━━━━━━━━━━━━━

🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 

🟨 संपर्क: दत्तात्रय पवार

📞 मो:8007913668

सांगोला दापोली बसमुळे शेतकरी आणि पर्यटकांची सोय ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

 सांगोला दापोली बसमुळे शेतकरी आणि पर्यटकांची सोय ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून सांगोला दापोली बसची सुरुवात  


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


सांगोला तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तसेच नवनवीन विकसित केलेली संकरित फळझाडे आणण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे जात असतात तसेच सांगोला तालुक्यातील हजारो पर्यटक कोकणात निसर्ग दर्शन घ्यायला जात असतात सांगोल्यातून दापोलीला जाणाऱ्या शेतकरी आणि पर्यटकांची सांगोला दापोली या नवीन बासमुळे चांगली सोय होईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. 


मंगळावर दि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते सांगोला ते दापोली ही नवीन बस सुरू करण्यात आली. या बसचे उद्घाटन प्रसंगी दिपकआबा बोलत होते. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सांगोला आगारप्रमुख विकास पोफळे, शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निळकंठ शिंदे सह सर्व पदाधिकारी तसेच आगारातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. यावेळी चालक आणि वाहनांचा सत्कार करण्यात आला. 

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी हा कष्टाळू आणि प्रयोगशील बनला आहे. त्यामुळेच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब शेतीतून क्रांती केली. आज सांगोला तालुक्यात डाळींब द्राक्षे आंबा पेरू तसेच अन्य फळ पिकांच्या बागा दिमाखात उभ्या आहेत यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच सांगोला तालुक्यातील पर्यटकांना नेहमीच कोकणचा नयनरम्य निसर्ग भुरळ घालत असतो त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि पर्यटकांचे दापोली आणि संपूर्ण कोकणाशी अतूट नाते निर्माण झाले आहे हेच नाते अधिक घट्ट आणि दृढ करण्यासाठी सांगोला आगाराने सुरू केलेली सांगोला दापोली ही बस निश्चितपणे मदत करेल असा विश्वास शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.


रविवार, १२ एप्रिल, २०२६

वक्तृत्वाने सर्वांगीण विकास सहज शक्य : डॉ. रवींद्र आरळी

 वक्तृत्वाने सर्वांगीण विकास सहज शक्य : डॉ. रवींद्र आरळी 

(समर्थ संस्थेची जत येथे वक्तृत्व व संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न)



जत:समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थे मार्फत 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत 'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण व समारोप समारंभ गंगाबाई गोब्बी शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय जत येथे जत चे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या शुभहस्ते व उपस्थित संपन्न झाला.या उपक्रमाचे कौतुक करून महिलांना राजकीय क्षेत्रात यापुढे आरक्षणामुळे प्रचंड संधी असून त्यांनी आता वक्तृत्व कला शिकून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावे. वक्तृत्वातून सर्वांगीण विकास सहज शक्य असून, कुशल वक्तृत्वाची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य सेवा मंचचे उपाध्यक्ष माणिक कोडक सर यांनी वक्तृत्वाची कार्यशाळा हि काळाची गरज आहे, बोलण्याने प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षेत्रात यश मिळवणे सोपे जाईल, समर्थ संस्थेने यापुढे असे उपक्रम राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविकामध्ये दिगंबर साळुंखे सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेचा कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला.यूट्यूब स्टार व ट्रेनर अनिल बन्ने फक्त बोलण्याच्या कौशल्यावर आम्ही दोन यूट्यूब चैनल चालवतो जत मध्ये सर्वात जास्त सबस्क्राईब चा सन्मान आम्हाला मिळाला. प्रशिक्षक मनीष काळे देशमुख यांनी महाराष्ट्रात दहाहजार पेक्षा जास्त वक्ते तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी साहित्य सेवा मंच जतचे नूतन अध्यक्ष लवकुमार मुळे, उपाध्यक्ष माणिक कोडग सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लवकुमार मुळे यांनी साहित्य क्षेत्रात वक्तृत्व हा एक पाया असून सादरीकरणासाठी कुशल वक्तृत्व महत्वाचे असल्याचे नमूद केले.


        या कार्यशाळेस नगरसेविका संगीता सोनुले,नयना सोनवने, सुषमा सुर्वे,मनीषा साळे,माधुरी पाटील, स्वाती बडचिकर,अभिलाषा कोडग, मयुरी सावंत,राजश्री उबाळे,मुस्कान नदाफ, योजना वाघमारे यांच्यासह प्रशिक्षणार्थी नी सहभाग नोंदविला. यांना प्रमाणपत्र मेडल व ट्रॉफी चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नम्रता सूर्यवंशी मॅडम व आभार समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.सुर्वे,राजू कोळीसो, हेमंत भोसले, लोखंडे सर, व्यंकटेश राठोड सर, चव्हाणसो, डॉ. सतीश येलपले, भोसले सर, अरुण अरळी, प्रवीण निगडी यांच्यासह जतवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart