Recent
शनिवार, १८ जुलै, २०२६
२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील
रविवार, १२ जुलै, २०२६
सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव*
गुरुवार, ९ जुलै, २०२६
पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरामाजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे
मंगळवार, ७ जुलै, २०२६
कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे खंडोबा देवस्थानला एक्वागार्ड भेट
सोमवार, ६ जुलै, २०२६
पांडुरंग गायकवाड यांचे निधन
रविवार, ५ जुलै, २०२६
देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’चा नाझरा येथून शुभारंभ; जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार – सभापती चेतनसिंह केदार सावंत
सांगोला :- महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री तथा सोलापुर जिल्हा पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक श्री. जयकुमारजी गोरे साहेब व माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, आमचे मार्गदर्शक श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ राबविण्यात येत असून, या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथून करण्यात आला.
सभापती चेतनसिंह केदार सावंत स्वतः या अभियानाचे नेतृत्व करत असून, प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सखोल आढावा घेणार आहेत. अभियानातील त्रुटींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे.
नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान माता व बाल आरोग्य योजना, आयुष्मान आरोग्य मंदिराच्या १३ सर्वसमावेशक सेवा, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सार्वत्रिक लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किशोर आरोग्य, कुटुंब नियोजन, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, डेंग्यू व फायलरिया नियंत्रण, असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य सेवा, आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, रोग सर्वेक्षण (IDSP), मोफत औषध वितरण, प्रयोगशाळा सेवा, विविध तपासण्या तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, जनआरोग्य समिती (JAS) सदस्य, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शासनाच्या सर्व आरोग्य योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. सेवा वितरणातील त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या अभियानामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होऊन सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस सांगोला पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते, विस्तार अधिकारी जयंत टकले, सुरेश चौगुले, भाऊ पाटील, सुरेश आदाटे, विजयकुमार जावीर, रमेश पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, रियाज काझी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
“ देवाभाऊ जनआरोग्य अभियान ” हा केवळ आढावा घेण्याचा उपक्रम नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न आहे. एकही पात्र नागरिक शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सभापती चेतनसिंह केदार सावंत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
शनिवार, ४ जुलै, २०२६
सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*
*खिलारवाडी-हलदहिवडी 4.5 किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*
*सांगोला* : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी दरम्यानच्या 4.50 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सुमारे *7 कोटी रुपये* खर्चाच्या या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विशेष आग्रहावरून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
*6 गावांना थेट फायदा*
या रस्त्यामुळे फक्त खिलारवाडी आणि हलदहिवडीच नव्हे, तर *गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी* या एकूण सहा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ता झाल्याने शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे. तसेच या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होणारी *दूध आणि ऊसाची वाहतूक* देखील आता कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकणार आहे.
*शहाजी बापूंचे आश्वासन*
यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले,
_"खिलारवाडी आणि माझे जीवनाशी निगडीत जवळचे संबंध आहेत. गेली अनेक वर्षे राजकारण ते समाजकारणाच्या क्षेत्रात येथील लोकांनी मला मोठ्या ताकतीने पाठिंबा दिला आहे. मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायमचा आग्रही राहीन. राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी लवकरात लवकर निधी आणून सर्व कामे पूर्णत्वास नेईन."_
याचबरोबर त्यांनी या भागातील *पाण्याच्या कॅनॉलचा फाटा लवकरच कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे* आश्वासनही दिले.
*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*
या भव्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य *दादासाहेब लवटे*, पंचायत समिती सदस्य *बाळासाहेब बंडगर*, *उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील, ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले* यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.









Social Media Icons