Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड.

 शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी सतीशभाऊ सावंत यांची निवड.



शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना 24 तास मदत करणार - सतीशभाऊ  सावंत

सांगोला प्रतिनिधी -

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या सह संपर्क प्रमुख पदी गोरगरिब रूग्णांना 24 तास मदत करणारे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओएसडी व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पंढरपूर विभागाचे प्रमुख असताना सतीशभाऊ सावंत यांनी रुग्णांना अविरतपणे मदत केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक गरजू रुग्णांना भरीव मदत केली अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटून बिलामध्ये सवलती देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेक रुग्ण आर्थिक मदत करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले याची गंभीर दखल घेऊन राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व खाली हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पदी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी निवड केली आहे.


 या पत्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10 % राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णता मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भातील मार्गदर्शन करून सदैव तत्पर राहावे तसेच गंभीर व  महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा असेही पत्रात संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे निवडी नंतर सतीश भाऊ सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

चौकट-

 सतीशजी सावंत यांचे गोरगरिबांसाठी मोठे काम आहे जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून दोन वेळा मतदारांनी त्यांच्या वर विश्‍वास टाकून निवडून दिले राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सतीशजी सावंत यांनी वैद्यकीय मदत कक्षा चे काम अतिशय चांगल्या प्रकारे करून गोरगरिबी रुग्णांना मदत करतील त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पश्‍चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क पदावर नेमणुक केली आहे.

- मंगेश चिवटे ओएसडी


चौकट-

 शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख म्हणून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे ओएसडी मंगेश चिवटे यांनी माझ्यावर जो विश्‍वास टाकून मला रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली टाकलेल्या विश्‍वासास मी कायमच पात्र राहणार आहे या शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या सांगोला तहसील कार्यालयासमोरील संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहुन रूग्णंना मदत करणार आहे.

- सतीशभाऊ सावंत

- सह संपर्कप्रमुख पश्‍चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष 

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

 जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील 



कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न 


सांगोला : तालुका प्रतिनिधी 


राजकारणात जय - पराजय होत असतात, एखाद्या पराजयाला खचून जाणारे साळुंखे कुटुंबीय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे शत्रू किती मोठा आहे यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहेत हे ओळखायला सुरुवात केली आहे. पाठीमागून चर्चा उठवण्यापेक्षा आणि रडीचा डाव न खेळता मैदानात येऊन सामना करावा असे ठणकावून सांगत, जवळा गावच्या आणि चार वाड्याच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केले जाईल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही असा विश्वास माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. 


   कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय दीपस्तंभ सारे शिकूया भारताचे दीपस्तंभ होऊया 25 फेब्रुवारी 2026 पासून रात्री 7 ते रात्री 9 पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद या संकल्पनेचा शुभारंभ काल मंगळवार दिनांक 24 रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. 

   या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, युवक नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील, भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुणभाऊ घुले सरकार, सुनील आबा साळुंखे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ मंडळी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  


   पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आत्मपरीक्षण करून पुढे कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामध्ये इथून पुढच्या काळात कोणताही कागद आणायसाठी आता सांगोल्याला हेलपाटे मारावी लागणार नाहीत. कारण प्रत्येक कार्यालय आता एका छताखाली सुरू होत आहे. यामधून जवळा आणि जवळच्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांची निश्चितपणाने गैरसोय दूर होणार आहे. एक फूट जागा कोण कोणाला देत नाही अशा परिस्थितीत साळुंखे पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा दिली आहे. ही साळुंखे पाटील कुटुंबीयांची दानत आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज शासकीय इमारतीचे उद्घाटन होत असताना मला मनस्वी आनंद आहे. कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक महिला मुलींच्या शाळेची कामे या एकाच ठिकाणी होणार आहेत. कागदासाठी आता सांगोला जाण्याची गरज नाही. ही व्यवस्था होत असताना कार्यतपस्वी आमदार काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्यातून घडत आहे यातच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

   यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले, सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करून जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. यासह जवळा गावात एकाच छताखाली सर्व विभाग कार्यरत होणार असल्याने शासकीय योजना राबवताना सोयस्कर होणार आहे. यामध्ये प्रत्येक योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवळा व पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


चौकट : 


अतोनात प्रयत्नांतर शासकीय सर्व विभागीय कार्यालय एकाच छताखाली सुरू होणार आहेत. यामधून शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. यामधून निश्चित पणाने नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील असा विश्वास आहे. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत सुरू होत असून हे आपले भाग्य आहे. 

  ॲड . यशराजे दीपकआबा साळुंखे पाटील



सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.

 सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.

.......................
[ केंद्रीय भूजल विभागाच्या माध्यमातून भूजलवैज्ञानिकांनी केलेल्या सविस्तर अभ्यास अहवालातील माहितीचा वापर करून स्थानिक पातळीवर भूजल व्यवस्थापन अद्ययावत करणे शक्य आहे : उपेंद्र धोंडे, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक, केंद्रीय भूजल मंडळ.]

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्या वतीने आज दि. २४ फेब्रुवारी रोजी बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये भूजल संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जल व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. एस एस पूर्ती व उपेंद्र धोंडे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. मुश्ताक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी बोलताना श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, पाण्याचा वापर काटकसरीने करणे, वृक्षारोपण वाढवणे आणि जलव्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे ही काळाची गरज आहे. पुढील काही महिन्यांत ग्रामसेवक व सरपंचांनी आपापल्या गावात यासंबंधी कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. 
या कार्यक्रमाचा भाग म्हणून श्री. एस एस पूर्ती, श्री. अमरनाथ व श्री. उपेंद्र धोंडे या केंद्रीय भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच डॉ. मुश्ताक शेख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय, सोलापूर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. 
यावेळी बोलताना डॉ. मूश्ताक शेख यांनी सांगितले की, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर हि सांगोला तालुक्यातील भूजल पातळी परिस्थितीबाबत सखोल माहितीची नोंद ठेवते, स्थानिक प्रशासनाने या माहितीचा उपयोग करून जनमानसात जलजागृती केली पाहिजे. इतर तांत्रिक सत्रात श्री. एस एस पूर्ती यांनी राष्ट्रीय जलधर नकाशाकरण अभ्यास अहवाल, सांगोला याचे सविस्तर सादरीकरण केले, श्री. अमरनाथ यांनी भूजल पुनर्भरण विषयावर मार्गदर्शन केले. श्री. उपेंद्र धोंडे यांनी उपस्थितांशी स्थानिक भूजल समस्या व त्याचे निराकरण याबद्दल खेळीमेळीने संवाद साधला, यावेळी स्थानिकांनी भूजलाची घसरती पातळी व शेततळी, तसेच भूजल पुनर्भरण संरचना अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी याबद्दल उत्स्फूर्तपणे प्रश्नं विचारले तसेच आपापल्या गावातील अनुभव कथनही केले. 
यावेळी केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्री. वैजिनाथ घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक , सरपंच, जलसुरक्षक, जलदूत तसेच स्थानिक सामाजिक संस्था प्रतिनिधी अशा एकूण ९५ सहभागींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने श्री. अमरनाथ, उज्ज्वल कुमार आणि इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. 

अधिक माहितीसाठी संपर्क:
उपेंद्र धोंडे 9271000195

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार.

डॉ.शीतल अजळकर सांगोला-पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा लवकरच सुरू करणार.
ग्रामीण मातांसाठी आशेचा नवा किरण; ग्रामीण महाराष्ट्रात नवजात अतिदक्षता सेवेला नवे बळ
सांगोला/प्रतिनिधी ः
महानगरांमध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून ग्रामीण भागातील मातांसाठी आणि नवजात बाळांसाठी सेवा देण्याचा धाडसी व संवेदनशील निर्णय घेत डॉ. शीतल सौरभ अजळकर (एमबीबीएस, एमडी - बालरोग, डीआरएनबी - नवजात शिशुशास्त्र) या सांगोला व पंढरपूर परिसरात नवजात अतिदक्षता सेवा सुरू करण्यास सज्ज झाल्या असून लवकरच सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातील गरजु रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
डॉ. शीतल अजळकर यांनी डीआरएनबी (नवजात शिशुशास्त्र) ही उच्च तज्ज्ञ पदवी संपादन केली असून त्यांनी या क्षेत्रातील भारतातील अत्यंत प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक असलेल्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल हैद्राबाद येथे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
डॉ. शीतल या सांगोला येथील सुप्रसिद्ध कै. डॉ. शंकरराव अजळकर यांच्या स्नुषा तसेच डॉ. अजळकर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. सौरभ अजळकर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
अकाली जन्मलेली बाळे, जन्मतः अत्यल्प वजनाची (1 किलोपेक्षा कमी वजनाची) बाळे तसेच जन्मानंतर तात्काळ किंवा नंतर उद्भवणार्‍या गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांचे अत्याधुनिक व तज्ज्ञ व्यवस्थापन करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील रूग्णांना होणार आहे.
नवजात संसर्ग, श्‍वसनाचा त्रास, कावीळ, जन्मावेळी मेंदूला ऑक्सिजनचा अभाव (बर्थ अ‍ॅस्फिक्सिया), नवजात बालकांतील फुफ्फुसांतील उच्च रक्तदाब (पीपीएचएन), जन्मजात चयापचय विकार, जन्मजात व आनुवंशिक आजार, मेंदू, हृदय, मूत्रपिंड व पचनसंस्थेचे गंभीर विकार तसेच स्तनपान किंवा आहाराशी संबंधित अडचणी - अशा प्रत्येक नवजात जीवासाठी संपूर्ण व प्रगत सेवा उपलब्ध करून देण्यात डॉ.शीतल अजळकर निष्णात आहेत.
उच्च वारंवारतेचा व्हेंटिलेटर (एचएफओव्ही), श्‍वसनासाठी नायट्रिक ऑक्साइड वायू उपचार, जन्मावेळी ऑक्सिजनअभावी झालेल्या मेंदूविकारासाठी नियंत्रित शीतोपचार पद्धती तसेच उच्च जोखमीच्या नवजात बालकांचे विशेष रुग्णवाहिकेद्वारे व हवाई मार्गाने सुरक्षित स्थलांतर या क्षेत्रातही त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

चौकट ः
आजवर अशा प्रकारच्या उपचारांसाठी पालकांना पुणे-मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागत होती; मात्र आता महानगरस्तरीय नवजात अतिदक्षता सेवा सांगोला-पंढरपूर परिसरातच उपलब्ध होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील त्यांच्या पुढील नियोजनाचा अधिक तपशील लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक नवजात जीव म्हणजे एक विश्‍व आणि त्या विश्‍वाच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञ हात आता आपल्या जवळ आहेत. अशी ही डॉक्टर शितल अजळकर यांनी सांगितले

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*

*वासुद गांवचे सुपुत्र डॉ.निरंजन आनंदराव केदार यांचा आरोग्य क्षेत्रातील "जीवन- संजीवन पुरस्काराने" सन्मान*
सांगोला : 
डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी.मेडिसिन) एक निष्णात डॉक्टर आणि तितकाच संवेदनशील माणूस….लहानपणापासूनच कलेच्या प्रांगणात वावरल्यामुळं अंगी बाणलेली संवेदनशीलता आणि खेळाच्या मैदानातून मिळालेली शिस्त, यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे डॉ. निरंजन आनंदराव केदार.सांगोला तालुक्यातील क्रांतिकारी गांव म्हणून ओळख असणाऱ्या मु.पो.वासुद-अकोला,गांवचे डॉ.निरंजन केदार सुपुत्र आहेत, सांगोला सारख्या ग्रामीण भागांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. केदार यांचे वडील श्री.आनंदराव गणपती केदार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते .श्री.आनंदाराव केदार सरांनी घराच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या जोरावर आपल्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कर्तृत्वाने गरिबीवर मात करत आपल्या तीनही मुलांनी उच्य विद्याविभूषित केले.डॉ. निरंजन केदार हे त्यांचे द्वितीय नंबरचे चिरंजीव ….कऱ्हाडच्या श्री. सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर,कराड येथे बालवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण अव्वल नंबर मिळवून पूर्ण केलं.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून अत्यंत चांगल्या गुणांची गुणवत्ता मिळवून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आणि शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्ग सुखर झाला.बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घेतल्यामुळे कर्मवीर आण्णांच्या जीवनपटाचा आणि प्रेरणादायी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला…आयुष्याच्या जडणघडणीत याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे…पदवीचे उच्य शिक्षण घेण्यासाठी ते सातारच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात ते डॉक्टरकीचे धडे गिरवण्यासाठी वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक,साहित्यिक,सामाजिक, राजकीय, वैद्यकीय या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वसंपन्न कर्तृत्वचा ठसा उमटवण्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.. डॉक्टरकीची पदवी संपादन करताचं त्यांना साताऱ्यातील डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील समाजोपयोगी काम बघून त्यांना आदर्श विद्यार्थी ,आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय ,सातारा हा पुरस्कार बहाल केला. बेळगांवच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉ.निरंजन केदार यांनी परराज्यात असून देखील आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा के.एल.ई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी हा पुरस्कार मिळवला आणि सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

        आरोग्य ,कला,क्रीडा,सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर माणुसकीच्या भावनेनं आणि सामाजिक जाणिवेतून “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेकदा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं,विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून ते समाजाची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीनं आणि उच्च दर्जाचे मोफत वैद्यकीय उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळावेत,यासाठी अहोरात्र धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.कला,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील कबड्डी, शरीरसौष्ठव अशा खेळांमध्ये अश्वमेध ,आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करून मैदान गाजवणारे डॉ. निरंजन केदार हे खिळाडूवृत्ती जोपासणारे ते एक यशस्वी खेळाडू तर आहेतच त्यासोबत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन या शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग) संघटनेचे ते राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम करतात. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळं समाजातील विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न ते करतात. 

*चौकट- "डॉ निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांचा विचाराचा वारसा रुजवण्याचे काम ते अत्यंत संवेदनशीलपणे करत आहेत. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम तर करत आहेतच. परंतु त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये निरपेक्षपणे मोलाची मदत करत आहेत. हे विशेष उल्लेखनीय त्यांचे काम विचारात घ्यावेच लागेल. भविष्यात अशी चांगली माणसं समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय होणे ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे."*
     अशा समाजभान असणाऱ्या व संशोधकवृत्तीच्या डॉ. निरंजन केदार यांचे अनेक रिसर्च पेपर Pubmed Scopus या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. अशा या हरहुन्नरी कलावंताला आणि नेतृत्वगुणसंपन्न अष्टपैलू डॉक्टर समाजसेवकाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना नव संजीवनी देऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *जीवन संजीवन पुरस्कार* मिळाल्याबद्दल सामाजिक राजकीय वैद्यकीय अनेक क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या पुढील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.

 भरधाव कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार.



वाटंबरे/ प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीत बरगाव कारणे पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करांडेवाडी फाटा येथे घडली.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात  विजय रघुनाथ भंडारे (वय 28, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्राम संजय आयवळे (वय 23, रा. मजरेवाडी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयवळे हा त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीच्या MH-02-BM-0815 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्यावेळी त्याने हिरो कंपनीची MH-45-AA-0535 क्रमांकाची मोटारसायकल चालवणारे अजय रघुनाथ भंडारे (वय 35, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत अजय भंडारे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलीचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ  घोंगडे करीत आहेत.


शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.

 चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत  बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.



सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत सुरेश बाबर यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत बाबर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी सोडून गावी येऊन आपली शेती हीच इंडस्ट्री म्हणून काम सुरू केले. शेती ही ढोबळमानाने न करता वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केली तरच शेती फायद्याची ठरेल. शेती करत असताना सेंद्रिय ,रासायनिक आणि जैविक या खतांचा योग्य वापर करून शेती केली तर फायदेशीर ठरते. शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघेल असे ध्येय ठेवले तरच शेती आणि शेतकरी यांचे समीकरण जुळते. अभिजीत बाबर यांनी भाजीपाला व डाळिंब शेतीमध्ये प्रगती करून नवलौकिक मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रगतशील युवा शेतकरी गुलाबराव भीमराव बाबर यांनी डाळिंब, द्राक्षे, ढोबळी मिरची या पिकाच्या माध्यमातून शेतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून नावलौकिक मिळवला. त्यांचाही सर्वत्र गौरव होत आहे. शिवजयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart