Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026रोजी उपोषण .: सतीश सावंत

 शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या  

घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026रोजी उपोषण .: सतीश सावंत 



सांगोला प्रतिनिधी :सांगोला येथे सांगोले नगरपालिका हद्दीतील शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या  

घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्र

असलेल्यांना बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा सांगोला नगरपालिकेची मा.बांधकाम समितीचे सभापती सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे व नागरिकांच्या प्रश्नासाठी उपोषण करणार असल्याचे सांगितले शासनाच्यावतीने महाराष्ट्र भर गोर-गोरीबांसाठी व ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी पतंप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधणे सुरू केली आहेत. या घरकुल योजनेमध्ये अनेकांना पैसे नसताना सुध्दा स्वतःची जागा असली तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा शासनाने प्रयत्न केला. ज्यांना जागा नाही ताशांना जागा देऊनही शासन गुरुकुल बांधून देत आहे शासनाने गोरगरींबांसाठी चालू केलेल्या या घरकुल योजनेचा लाभ सांगोला शहरातील अनेक नागरिकांनी घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी क वर्ग नागपालिका आहे. या नगरपालिकेची स्थापना 10 जानेवारी 1855 रोजी झालेली आहे. याचे क्षेत्रफळ सुमार 68.82 चौ. कि.मी. आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोखसंख्या 40 हजारांपर्यत इतकी आहे. यामध्ये 13 वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. सांगोला शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सांगोला शहरात नागरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रीन झोन मध्ये पंतप्रधान आवास योजनेला बांधकाम परवानगी देण्यात यावी.

यापुर्वी सांगोला नगरपालिकेने ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले. त्यामुळे अनेकांनी घरे बांधली व अनेकांना या घरकुल योजनेचा लाभ घेता आला. परंतू नगरपालिकेेने अचानकच ग्रीन झोन मधील घरकुलाचे बांधकाम परवाने व वापर परवाने बंद केले. त्यामुळे अनेकांची घरे बांधण्याची स्वप्ने अर्धवटच राहिली अनेकजण नगरपालिकेमध्ये ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने मागण्यासाठी हेलपाटे घालतात परंतू त्यांची कसलीही दखल घेतली जात नाही. ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले तर गोर-गोरीब नागरिक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेईल. व शासनाच्या या घरकुलाची योजना वाड्यावस्त्यापर्यंत पोहचेल त्यामुळे सांगोला शहरासह वाड्यावस्त्यावरील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा.

सध्या नगरपालिका प्रशासनाने वाड्यावस्त्यांवर पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या ग्रीन झोनमधील बांधकामाला 1एकर म्हणजे 40 आर क्षेत्राची अट लागू केली आहे. सर्वांची 40 गुंठे क्षेत्र नाही गोरगरिबांना गुंठा दोन गुंठे क्षेत्र आहे 40 आर क्षेत्र असेल तर ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवाना दिला जाईल अशी अट घातली आहे. परंतु शहरातील वाढीव भाग व वाड्यावस्त्यांवरील नागरीक गरीब आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा लाभ घेणारे नागरिकांना 2 ते 3 गुंठेच्या वर क्षेत्र नाही. जर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला नसता. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणारे नागरीक 2 ते 3 गुंठे क्षेत्र असलेलेच लाभार्थी आहेत. नगरपालिका हद्दीत 2 ते 3 गुंठे ग्रीन झोनमध्ये क्षेत्र असलेल्यांना बांधकाम परवाना देत नसल्याने शासनाच्या या पंतप्रधान आवास योजनेमध्ये एकाही नागरिकाला याचा लाभ होत नाही. ही योजना पूर्णपणे सांगोल्यातून हद्दपार करण्याचा अधिकार्‍यांचा डाव आहे. तरी शासनाने व नगरपालिका प्रशासनाने ग्रीन झोनमध्ये 2 गुंठेच्या पुढे क्षेत्र असलेल्या ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधणार्‍या नागरिकांना बांधकाम परवानगी व वापर परवाना देण्यात यावा. यामुळे नगरपालिकेच्या कर आकरणी व पाणीपट्टीतही वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्र असणार्‍यांना बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा. अन्यथा मी 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले


शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”*

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला



महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास  सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते.


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.



यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


याप्रसंगी  आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी  मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, ३० जुलै, २०२६

कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*

 *कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*



*महास्वामींच्या मठात शिवपाठ, पारायण, भजन, किर्तन, गुरु दीक्षा, रक्तदान, महाप्रसाद वाटप करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..*

नाझरे प्रतिनिधी 

   !!गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोचि सच्चिदानंद, गुरुचे करा भजन, गुरु करी दुःख निवारण, गुरु माझा योगीराणा, गुरुपायी श्रद्धा हीच खरी गुरुदक्षिणा..!!

    हेच विचार मनात घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे ता. सांगोला येथील महास्वामींच्या मठात लाखो भाविकांनी नतमस्तक होऊन गुरु शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती गुरुपौर्णिमा दिवशी महास्वामीच्या मठात दिसून आली. गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, कोळेकर महास्वामी की जय, हर हर महादेव या जयघोषाने कोळेनगरी दुमदुमली व कोळेगावातून भव्य रथात मिरवणूक महास्वामींची काढून, जयघोष करून गुरुप्रती वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले, कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व कोळेकर महास्वामीजी 31सावे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. 

    भारतीय संस्कृतीत गुरूला फार महत्त्व आहे, गुरु केवळ ग्रंथ शिकवणारा नसून योग्य मार्ग दाखवणारा आहे व संसार रुपी सागर पार करायचा असेल तर गुरुची गरज आहे व गुरुचरणाशी मस्तक टेकवणे गरजेचे आहे व प्रत्येकाने गुरुची सेवा करा यश प्राप्ती होईल असे कोळेकर महास्वामींनी आशीर्वाचनात सांगितले व सात दिवस सर्वांनी मिळून कार्यक्रम सुंदर केला तसेच प्रत्येकाने घरचे काम समजून मनातील सेवा केली व त्यामुळे कुदळे कंपनी, कोळे ग्रामस्थ, वीरशैव तरुण मंडळ, गुरु गादी मठ संस्थान पदाधिकारी, महिला, युवक, आबाल वृद्ध या सर्वांना गुरुचा आशीर्वाद आहे असेही महास्वामिनी यावेळी सांगितले. यावेळी असंख्य सेवेकरी यांचा गुरू गादी तर्फे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत भजनी मंडळ, ढोल ताशा, वाजंत्री, गजी ढोल इत्यादीचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.

*‌.. शेकडो भक्तांचे रक्तदान..*

  गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोळेकर महास्वामींच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पानंद रस्ते अध्यक्ष सचिन देशमुख, मा. उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, शिंदे मेजर, अमोल कोरे, दुर्वास शेटे व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी 175 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर यांनी सांगितले. 

*.. नेटके नियोजन..*

  गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी नेटके नियोजन केले होते. यावेळी महाप्रसाद देणारे गुरुभक्त अर्जुन खरसुडे व परिवार तासगाव तसेच देणगीदार महादेव पैलवान, माया पैलवान व सौ मालन शिवपुजे यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. 

*.. लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..*

सकाळी अकरा वाजल्यापासून रात्र बारा वाजेपर्यंत अन्नछत्र मंडळात लाखो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ‌ यावेळी सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले.

बुधवार, २९ जुलै, २०२६

वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी. धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.

 वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी.

धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.



वाटंबरे (प्रतिनिधी):

रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंट हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसविण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

या कट पॉईंटवरून अकोला, वासूद, कडलास तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, कट पॉईंटच्या उत्तरेकडील बाजूस तीव्र वळण आणि उतार असल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग अधिक असतो. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक व वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या कट पॉईंटवर तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. 


फोटो:  वाटंबरे येथील अपघातप्रवण कट पॉईंट , उत्तरेकडून तीव्र गतीने येताना चार चाकी वाहन दिसत आहे .

सोमवार, २७ जुलै, २०२६

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन.

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील वाॅटर फिल्टर खरेदी विक्रीचे उद्योजक सत्यप्रकाश पवार यांचे सोमवार दि. २७ जुलै रोजी अपघाती निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय ३५ वर्ष होते. त्यांच्या अपघाती निधनाने वाटंबरे गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीत होणार आहे याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

रविवार, २६ जुलै, २०२६

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन.

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
वाटंबरे येथील जनार्दन पांडुरंग पवार यांचे शनिवार दि. 25 जुलै रोजी वयाच्या ८१ वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,नातवंडे ,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीमध्ये होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार

 कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार 



चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 


राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. 

सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले. 


चौकट ; 


१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील 


सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात. 


 आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart