Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

Recent

recentposts

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार

 कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार 



चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 


राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. 

सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले. 


चौकट ; 


१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील 


सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात. 


 आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

गुरुवार, २३ जुलै, २०२६

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

 माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

 संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश





पंढरपूर (दि.22) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.



माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली , टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा ... आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. 


यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वागत केले. 


                                                     

शनिवार, १८ जुलै, २०२६

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील 

मुख्यमंत्री सहायता कक्ष व काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम



सांगोला ; तालुका प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त देशभरातून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ जुलै रोजी नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथे दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात लोकसहभागातून वारकऱ्यांना आरोग्य तपासणी, औषधोपचार, चरणसेवा, अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
या शिबिराच्या नियोजनासाठी शनिवारी (१८ जुलै) नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा येथे बैठक पार पडली. बैठकीस वाढेगाव, बामणी, मांजरी, संगेवाडी व शिरभावी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. 

यावेळी दिपकआबा म्हणाले, राज्यात परंपरा आणि संस्कृती जपणारे सरकार कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्रा वाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या पुढाकारातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच संकल्पनेतून हा सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाखो भाविक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे अनेक वारकऱ्यांना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर शिबिरात वारकऱ्यांच्या पायांची आयुर्वेदिक तेलाने मालिश करून चरणसेवा, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वाटप तसेच अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

वारकऱ्यांना आरोग्य, भोजन किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून या दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.






रविवार, १२ जुलै, २०२६

सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव*

*सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव*
सांगोला | प्रतिनिधी
लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी, सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि सुर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धे मधील सहभागी स्पर्धक व विजेत्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
          यावेळी आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, सौ.निकिताताई देशमुख, मा. डॉ. प्रभाकर माळी (चेअरमन), सुर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा श्री. अनिलभाऊ इंगोले, मा. विजय राऊत, डॉ. विजय बंडगर, डॉ. संगीता पिसे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, डॉ. महेश राऊत, डॉ. संतोष पिसे, डॉ. वैभव जांगळे, डॉ. निरंजन केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          स्पर्धेत उत्कृष्ट रील निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक (₹५,००१) – सुशांत कोडक (एस. के. सिनेमॅटिक),द्वितीय पारितोषिक (₹३,००१) – साहिल वाघमारे (द साहिलग्राफी), तृतीय पारितोषिक (₹२,००१) – आर्यन लीपारे (झिरो सिनेमॅटिक) विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
          तसेच सिनेमॅटोग्राफर श्री. मकरंद भोरे, उमर बागवान आणि श्री. निलेश लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इरशाद बागवान यांनी प्रभावीपणे केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगोला मॅरेथॉन-२०२६ च्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत, सामाजिक उपक्रमांना तरुणांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रील स्पर्धेमुळे सांगोला मॅरेथॉनचा संदेश मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचला असून, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वासही आ. डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.

गुरुवार, ९ जुलै, २०२६

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरामाजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे मात्र, सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. कृष्णा कोयना भीमा पंचगंगा आणि नीरा नदीच्या पात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तत्काळ टेंभू उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्याला सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवर होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे विहिरी, तलाव आणि कुपनलिका तसेच अन्य जलस्रोतांनी तळ गाठल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कृष्णा, कोयना भीमा निरा पंचगंगा तसेच अन्य नद्यांच्या खोऱ्यात व घाटमाथ्यावर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. या नदीकाठील लोकांचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या सांगोला तालुक्यातील माणगंगा, कोरडा, आफ्रुका आणि बेलवण यासारख्या नद्या मात्र ऐन पावसाळ्यात कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे कृष्णा, कोयना,भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीतून वाहून जाणारे पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माणगंगा नदीत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत आणि नीरा नदीचे पाणी सांगोला शाखा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास आणि या पाण्यातून सांगोला तालुक्यातील छोट्या मोठ्या तलावांना पाणी सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त अशा दोन्ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणून राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ टेंभू योजना म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. 

चौकट ; 

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ; मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कृष्णा, कोयना, निरा पंचगंगा या नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीच्या काठावरील लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना व नीर उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील


मंगळवार, ७ जुलै, २०२६

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे खंडोबा देवस्थानला एक्वागार्ड भेट

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान चरणी एक्वागार्ड भेट. 

सांगोला/ प्रतिनिधी 

 नांगोळे (कवठेमंकाळ) येथील संजय रुद्रप्पा वाले या कुटुंबाच्या वतीने त्यांचा मुलगा कै . सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे (सांगोला) येथील जागृत खंडोबा देवस्थान या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एक्वागार्ड देण्यात आले.  खंडोबा देवस्थानचे पुजारी तसेच वाटंबरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  खंडोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

सोमवार, ६ जुलै, २०२६

पांडुरंग गायकवाड यांचे निधन

पांडुरंग गायकवाड यांचे निधन 


पंढरपूर /प्रतिनिधी 
  

बोहाळी (ता.पंढरपूर ) येथील पांडुरंग दत्तू गायकवाड यांचे वयाच्या  ८५ वर्षी  य
 हृदयविकाराच्या झटक्याने दि. ६ जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार सुरेश गायकवाड यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने डोहाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart