Recent
रविवार, २६ जुलै, २०२६
वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन.
शुक्रवार, २४ जुलै, २०२६
कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार
कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार
चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला.
सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले.
चौकट ;
१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील
सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात.
आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
गुरुवार, २३ जुलै, २०२६
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट
संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
पंढरपूर (दि.22) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.
माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली , टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.
जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा ... आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वागत केले.











Social Media Icons