Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ मे, २०२५

बापूंचं काम बोलत राहणार!

बापूंचं काम बोलत राहणार!


सांगोला / प्रतिनिधी
“आमदार असो किंवा नसो, सांगोला तालुक्यासाठी मी कायम काम करत राहणार,” असे स्पष्ट शब्दांत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मा. शाहाजीबापू पाटील यांनी वारंवार सांगितले आहे. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी सांगोला बस स्थानकासाठी २० नव्या बसगाड्यांची मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.

या मागणीसंदर्भात शाहाजीबापूंनी स्वतः प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, सांगोला तालुक्यातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समोर मांडल्या. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनानुसार पहिल्या टप्प्यातील ५ आधुनिक बीएस-६ श्रेणीतील बसगाड्या उद्या सांगोला बस स्थानकात दाखल होणार आहेत. या बसगाड्या ASHOK LEYLAND कंपनीच्या असून, त्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायक होणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना वेळेवर बससेवा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि महिला प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

शहाजीबापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. "बापूंचं काम बोलतंय," हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

सांगोल्यात शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन .

 सांगोल्यात शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन .



महूद येथे शिवसेना व निरादेवधर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याच्या वतीने फलटणचे नेते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रति कात्मक चित्राला जोडी मारून जाहीर असा निषेध करून घोषणाबाजी करत जोडी मारू आंदोलन करण्यात आले बुधवारी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब व माजी आमदार शहाजी बापू पाटील साहेब व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निरादेवधरचे सांगोला तालुक्याला लाभक्षेत्रात तसेच पंढरपूर तालुक्यातील काही भागाला एक टीएमसी पाणी मंजूर करायचे ठरले असून तसा शासन निर्णयही झाला आहे पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी धरपडणारी शेतकरी व कष्टकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून कालच शहाजी बापू पाटील साहेब यांचा सांगोल्यात ठीक ठिकाणी सत्कार फटाक्यांची आतिषबाजी व पेढे भरून याचा कार्यक्रम झाला यालाच गालबोट म्हणून काल फलटण येथे काही नेत्यांची बैठक होऊन संजीव राजे निंबाळकर दीपक चव्हाण आदी लोकांनी सांगोला तालुक्याला व पंढरपूरला पाणी देण्याबद्दल विरोध दर्शवला म्हणून आज महूद येथे शिवसेनेच्या वतीने व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने संजीव राजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले यावेळी शहाजी बापू पाटील साहेब यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे संजय मेटकरी राजेंद्र मिटकरी 


सरपंच सुरेश कदम कालिदास भोसले प्रमोद उबाले नवनाथ येडगे ओंकार पाटील अरुण भाऊ नागणे सोमनाथ मरगर तानाजी भोसले उदयसिंह पाटील दीपक सरगर चेअरमन महेश पाटील कुंडलिक पवार अमोल सरडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते दादासाहेब लवटे यांनी मा आमदार शहाजी बापू पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी योग्य आहे पाण्यासाठी असणारी तळमळ किती बरोबर आहे परंतु विद्यमान आमदार व विद्यमान खासदार या विषयावर पाणी आम्ही आणलं म्हणून दावा करतात व आतील बाजूनी फलटणची बाजू घेतात अशी घनाघाती टीका करत आमदार व खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी  असे आव्हान केले


शनिवार, २९ मार्च, २०२५

सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

सांगोल्यासाठी राजेवाडी, निरेचे पाणी सोडण्याची चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

सांगोला ( तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके पाण्यावाचून करपून चालली आहेत. अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून तसेच निरा उजवा शाखा नं. ४ व ५ चे उन्हाळी आवर्तन सुरु करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
      राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली. तालुक्यातील खवासापूर, लक्ष्मीनगर, चिकमहुद, नराळेवाडी, व वाकी गावांना राजेवाडी तलावातून प्रत्येक वर्षी पाच आवर्तने सोडण्यात येतात. परंतु चालू वर्षी उन्हाळी आवर्तने प्रकरण प्रसिद्ध केले नाही. सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके आहेत. सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजेवाडी तलावातून उन्हाळी आवर्तने प्रसिद्ध करून वरील गावांना पाणी सोडण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
          तसेच तालुक्यातील वाकी, शिवणे, चिंचोली, शेळकेवाडी, एखतपूर या गावातील लाभधारक शेतकऱ्यांना नीरा उजवा कालवा शाखा नं. ४ व ५ मधून पाणी मिळते. परंतु आता नीरा उजवा कालवाचे शाखा नं. ४ व ५ ला उन्हाळी आवर्तन सोडले नाही. सदर गावामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डाळींब, बोर, आंबा, केळी अशी पिके आहेत. सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून भाटकर धरणामध्ये उन्हाळी आवर्तन करून पाणीसाठा शिल्लक आहे. तरी शिलक पाण्यामधून शाखा नं. ४ व ५ ला वरील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून तत्काळ पाणी सोडण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

पाणीप्रश्नांच्या पाठपुरव्याला यश, विस्तारित टेंभूसाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध - आमदार शहाजीबापू पाटील

 




सांगोला (प्रतिनिधी): टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त आठ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच टेंभू, म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले आहे. विस्तारित टेंभू योजनेच्या कामाची ७५३ कोटी ७९ लाख रुपयांची निविदा शासनाने काढली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

.       विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळावी, यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाने विस्तारित टेंभू योजनेच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील गावे ओलिताखाली येणार आहेत. विस्तारित योजनेसाठीही पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सुमारे ७५३ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाची ई-निविदा काढल्याने माझ्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे काम पूर्ण झाले असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

       टेंभू योजनेच्या विस्तारित कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून यातून बेवनूर थेट गुरुत्व नलिका व त्यावरील वितरिका, लघुवितरिकांचे काम बंदिस्त पाईपलाईन पद्धतीने करणे, पुढील पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्ती व परीचलन करण्यात येणार आहे. तसेच सातत्याने पाठपुरावा केल्याने म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये नवीन ८ वंचित गावांचा समावेश केल्याने आता म्हैशाळ योजनेमध्ये घेरडी, सोनंद, पारे, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, जवळा व आगलावेवाडी या गावांसह पारे, हंगिरगे, जवळा व नराळे येथील तलावांचा  समावेश करण्यात आला आहे.

          तसेच टेंभू योजनेतील कामत गुरुत्व नलिकेतून ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तर डोंगरगाव, हणमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.


चौकट

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगोल्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावेळी उन्हाची तीव्रता लक्षात घेवून उन्हाळी हंगामासाठी दोन महिने कालवा चालविण्याचे ठरले आहे. पाण्याची गरज लागली तर त्यापुढे आठ दहा दिवस. कालवा चालविण्याचे ठरले आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

     

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा

सांगोला (तालुका प्रतिनिधी): प्रवाशांची मागणी लक्षात घेवून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

      याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, कलबुर्गी - कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र, या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निदर्शक विवेककुमार सिन्हा यांनी  कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी - कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.

 पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.



आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व सामान्यजनते पर्यंत पोहोचवावी यासाठी *गाव चलो  अभियान* सुरू करण्यात आले आहे.


या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी  कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे  भाजपा पंढरपूर दक्षिण मंडलाच्या  वतीने  गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यशाळेस माढा लोकसभा निवडणुक प्रमुख  मा. आ. श्री.प्रशांत परिचारक साहेब , माढा लोकसभा समन्वयक मा.श्री.राजकुमार नाना पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष मा.श्री चेतनसिंह केदार - सावंत साहेब, यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.सचिन शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप,गाव चलो अभियान  जिल्हा संयोजक लक्ष्मण केंकान,माढा लोकसभा विस्तारक मा.श्री.अनंत राऊत ,पंढरपूर मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, विधानसभा  विस्तारक वारपे ,सर्व सुपर वॉरियर्स ,गाव चलो अभियान प्रवास कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.

स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.

 {सांगोल्यासाठी उजनीचे २ टीएमसी पाण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची मंजुरी.}

 सांगोला (वार्ताहर)
                सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला काल सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईहून आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
         सन १९९७ मध्ये मूळ मंजूर असलेली ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सन २००० ते २०१९ या काळामध्ये सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरी नंतर पाच वर्षांनी सन २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली. आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सन २०२० सालापासून या कामाचा पाठपुरावा केला व नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला योजना पूर्ण करण्यासाठी ८८३ कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून काल सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
         आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून १७ नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण करण्यात आलेल्या या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, य.मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या १२ गावांना सुमारे ३३ हजार एकर क्षेत्राला व अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर असे एकूण ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याने दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाणार आहे. निवडणुकीमध्ये दिलेला शब्द मी खरा केला असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या पुढील काळामध्ये पाणी या विषयावर कोणतीही निवडणूक अथवा राजकारण होणार नसल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
         स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला ही योजना सांगोला तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची योजना असून लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असून ही योजना मंजूर करण्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे खूप मोठे योगदान असून सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी टेंभू, म्हैशाळ, निरा उजवा कालवा व उजनीचे दोन टीएमसी पाण्यासहित सांगोला तालुक्याला सुमारे 12 टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
             बातमी समजताच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून शहरातील मुख्य चौकांमध्ये फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीला अजितदादांचा ग्रीन सिग्नल ; सांगोला तालुक्यात उत्साहाचे वातावरण.

 आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीला अजितदादांचा ग्रीन सिग्नल ; सांगोला तालुक्यात उत्साहाचे वातावरण.





    सांगोला : तालुका प्रतिनिधी गेली २३ वर्षे निधी आभवी धूळखात पडून असलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन आगामी अर्थसंकल्पात या योजनेच्या पूर्ततेसाठी भरीव निधीची तरतूद करणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात अजितदादांकडे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खुद्द उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादांनीच ग्रीन सिग्नल दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उजनी धरणातून सांगोला तालुक्यासाठी तब्बल २ टी एम सी पाणी मंजूर होते. या योजनेचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांच्याहस्ते साळमुख ता माळशिरस येथे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र भूमीपुजनानंतर ही योजना रेंगाळली आणि सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली. परंतु सांगोला तालुक्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. ही योजना पूर्ण करून सांगोला तालुक्याला हक्काचे २ टी एम सी पाणी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या योजनेची पूर्तता करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीत या योजनेस अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन हवा तितका निधी देऊ आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण करू यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करू असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, वर्षानुवर्षे मंत्रालयाच्या फायलीत अडकलेली योजना मार्गी लावल्यास सांगोला तालुक्याला यातून हक्काचे २ टी एम सी पाणी मंजूर होणार आहे. या पाण्यातून तालुक्यातील सिंचानापासून वंचित गावातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कागदोपत्री पाणी मंजूर असूनही सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशा परिस्थितीत राज्य सरकारने मायबाप जनतेवर कृपा दाखवावी आणि रखडलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला निधीची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. या मेळाव्यात बोलताना दिपक आबांच्या मागणीला दादांनीही ग्रीन सिग्नल दिल्याने उजनीचे २ टी एम सी पाणी सांगोला तालुक्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


 सिंचनापासून वंचित गावांना होणार फायदा सांगोला तालुका हा तालुका नैसर्गिकदृष्ट्या अवर्षणप्रवन असल्याने सातत्याने पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी शेतकऱ्यांना सतावतो यावर शाश्वत मार्ग काढण्यासाठी सरकारने तालुक्यासाठी सांगोला उपसा सिंचन सारख्या योजनांना मान्यता देऊन या योजनांना निधीची तरतूद करावी अशी मागणी उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण केली होती दादांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांना याचा लाभ होणार आहे. 
 मा आम. दिपकआबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart