हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास
बलवडी येथे हुतात्मा महादेव शिंदे स्मारकाचे अनावरण संपन्न
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
बलवडी गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व शौर्याचा आहे कारण 59 वर्षानंतर सुद्धा गावकऱ्यांच्या मनात वीर सुपुत्र हुतात्मा महादेव शिंदे व वीर माता पद्मिनी आई शिंदे यांच्या बद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी दिसून येत आहे. त्याबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद तर देतोच परंतु माझे भाग्य आहे की माझ्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले व मला कार्यक्रमात भाग घेता आला त्यामुळे हुतात्मा महादेव शिंदे यांना प्रथम अभिवादन करतो व बलवडी गावात हुतात्मा भवन साठी 50 लाखाच्या निधीची घोषणा करतो असे सांगून हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बलवडी ता. सांगोला येथे बोलताना व्यक्त केला.
या स्मारक अनावरण प्रसंगी अध्यक्षस्थानी मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख हे होते.
ऊन, वारा, पावसामध्येही देशाचे रक्षण करणारा सैनिक महत्त्वाचा घटक असून त्याची देश सेवा संपली तरी देशप्रेम संपत नाही व विजयदादा शिंदे यांनी ही गावाची योगदान असल्याचे सांगितले तसेच वीर माता पद्मिनी आई यांनी कुटुंब उभारून ताकद दिली व त्यामुळे साठ वर्षानंतर पुन्हा त्यांना वंदन करताना त्यांचे योगदान विचारात घ्यावे लागेल. असेच मान नदीत पाणी सोडले व आता विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावू व देशासाठी शिंदे कुटुंबाचा त्याग मोठा आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस प्राचार्य संभाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तसेच हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून एक सांगोला तालुक्यात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले. सदर प्रसंगी वीरमाता पद्मिनी आई शिंदे व सुभेदार राजेंद्र धायगुडे यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भजनी मंडळ व गजी ढोल या पारंपारिक वाद्याने कार्यक्रमात रंगत आणली. शिंदे कुटुंबास सर्व गावांनी सहकार्य केले व सर्वांनी मिळून समाधी स्थळ उभारले व त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहू असे माजी सरपंच विजय दादा शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार बाळू ताई भागवत, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, भाजपा नेते बाळासाहेब एरंडे, शिक्षण सभापती चेतन सिंह केदार, सभापती पुनम ताई इंगोले, जि प सदस्य शोभाताई खटकाळे, माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, माजी सभापती संभाजी तात्या आलदर, पानंद रस्ते सह अध्यक्ष सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते, डॉक्टर शिवराज भोसले, मच्छिंद्र मामा इंगोले, युवा नेते उल्हास दादा धायगुडे, अमर दादा लिगाडे, पोपटराव गडदे, प्रशांत वलेकर, चेअरमन संजय धायगुडे, चेअरमन शिवाजी शिंदे, नगरसेवक बाळासाहेब झपके, सरपंच ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, समाधान शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व संचालक, शिक्षक नेते रमेश शिंदे व सर्व परिवार, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी सैनिकांची लक्षणे उपस्थिती होती.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षक तात्यासो शिंदे तर सर्वांचे आभार माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले.
१) पालकमंत्र्यांकडून हुतात्मा भवनसाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा
हुतात्मा महादेव शिंदे यांनी देशाच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे निश्चितपणे प्रेरणादायी आहे. येणाऱ्या पिढ्यांना या स्मृतिस्थळावरून नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त करताना या परिसरात नवीन हुतात्मा भवन उभारण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
२) शिंदे व साळुंखे कुटुंबांचे ऋणानुबंध.
हुतात्मा महादेव शिंदे व ह.भ.प. स्व. शारदाताई साळुंखे पाटील यांचे बहीण भावाचे नाते होते व यापुढेही शिंदे व साळुंखे कुटुंबाचे ऋणानुबंध संबंध राहतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मान नदीत पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आता यापुढे त्यांनी पाण्याबरोबर विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावावेत.
दिपकआबा साळुंखे पाटील,
माजी आमदार
फोटो ;



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा