Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १८ जुलै, २०२६

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील 

मुख्यमंत्री सहायता कक्ष व काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम



सांगोला ; तालुका प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त देशभरातून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ जुलै रोजी नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथे दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात लोकसहभागातून वारकऱ्यांना आरोग्य तपासणी, औषधोपचार, चरणसेवा, अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
या शिबिराच्या नियोजनासाठी शनिवारी (१८ जुलै) नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा येथे बैठक पार पडली. बैठकीस वाढेगाव, बामणी, मांजरी, संगेवाडी व शिरभावी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. 

यावेळी दिपकआबा म्हणाले, राज्यात परंपरा आणि संस्कृती जपणारे सरकार कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्रा वाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या पुढाकारातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच संकल्पनेतून हा सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाखो भाविक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे अनेक वारकऱ्यांना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर शिबिरात वारकऱ्यांच्या पायांची आयुर्वेदिक तेलाने मालिश करून चरणसेवा, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वाटप तसेच अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

वारकऱ्यांना आरोग्य, भोजन किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून या दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart