शक्तिपीठ महामार्ग शासनाने सक्तीने करण्याचा प्रयत्न केल्यास अती तीव्र आंदोलन करणार..भाई दिगंबर कांबळे.*
*शक्तिपीठ महामार्ग शासनाने सक्तीने करण्याचा प्रयत्न केल्यास अती तीव्र आंदोलन करणार..भाई दिगंबर कांबळे.*
नाझरे प्रतिनिधी:
शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग
बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे वतीने आज. सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक, कोळा, सोमेवाडी, चोपडी, नाझरे, वझरे, अजनाले, चिणके, कमलापुर, एकतपुर, चीचोले मेथवडे, मांजरी, गावातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी, लढ्याचे नेते भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन मा .प्रांताधिकारी मंगळवेढा यांना दिले..
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7/3/2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून.. त्यामधे शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या हरकती , आक्षेप 21 दिवसात अर्जा द्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविणे बाबत नमूद केले आहे..या अधीसुचने नुसार आज लिखित अर्जा द्वारे आक्षेप नोंदविनेत आले.
आमच्या जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या आमच्या बागायती जमिनी मधून महामार्ग गेल्याने आम्ही संपूर्ण उध्वस्त होणार आहोत , कुटुंब वाढी मुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत...
महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 /10/2021 रोजी चे मोबदल्या बाबतच्या परिपत्रक नुसार गुणांक एक नुसार आपण मोबदला देणार आहे व तोही रेडीरेकणर नुसार ..त्यामुळे आमची एक एकर जमीन तुम्ही घेवुन आम्हाला तुम्ही दिलेल्या मोबदल्यात एक गुंठा पण जमीन मिळणार नाही.. यामुळे आमच्या वर प्रचंड मोठा अन्याय आहे... शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून. सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे... त्यामुळे आमच्या बाधीत क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदी ने एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला, जिथे एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत कमी चार कोटी रुपये द्यावा व मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा...
नियोजित शक्तिपीठ महामार्गा मध्ये
डाळींब बागा द्राक्ष बाग व उसाची शेतीच उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या बरोबर हजारो शेतमजूर सुद्धा बेरोजगार होणार आहेत...
नियोजित शक्तिपीठ महामार्गामुळे नागरिकांचा, शेतकऱ्यांचा कसलाही विकास नसून या मध्ये पर्यावरणाला भकास करण्याची योजना आहे.. त्यामुळे सदरचा प्रकल्प रद्दच करण्यात यावा.. असा आक्षेप व हरकत सर्व बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने नोंदविण्यात आली शासनाने शेतकऱ्यांच्या 22 मागण्या पूर्ण करून मगच महामार्गाचे हद्दी फिक्स करण्याचे काम करावे असे न केल्यास महामार्गासाठी एक इंच पण जमीन आम्ही देणार नाही.. सरकारने सक्तीने भूसंपादन करण्याचा व दडपशाहीचा वापर केल्यास अती तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे राज्य समन्वयक भाई दिगंबर कांबळे यांनी दिला..यावेळी शरद पवार, सागर बिले, महेश बिले, मनोज चौगुले, संतोष सरगर, निलेश हागिर ,प्रभाकर केंगार, काशिनाथ पाटील, सतीश बनसोडे, अमोल बनसोडे,
व मोठ्या संख्येने बाधीत शेतकरी उपस्थित होते.


No comments