भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गणेश तात्या भेगडे व कोषाध्यक्ष मा. शशिकांत भाऊ देशमुख यांचे उदनवाडी येथे जंगी स्वागत .
भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गणेश तात्या भेगडे व कोषाध्यक्ष मा. शशिकांत भाऊ देशमुख पंढरपूर सांगली दौऱ्यावर आले असता त्यांचे उदनवाडी येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. भाजप जेष्ठ नेते माणिकराव सकट व विकास दत्तात्रेय वलेकर भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग सांगोला तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली उदनवाडी येथे जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी शेकडोच्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा नेते नवनाथ भाऊ पवार, डॉ.परेश खंडागळे, निवास बनसोडे, अशोक कांबळे, तानाजी नाना कांबळे, महादेव आलदर, दगडू कांबळे, अजित तवटे, उत्तम आलदर, दादा गुळीग, अमोल गुळीग, फैजुद्दीन शेख, सिधू शिंदे, सुखदेव सरगर, नारायण रुपनर, सुब्राव चव्हाण व भाजपचे युवा नेते ओंकार सकट, मधुकर वलेकर, शिवाआबा वलेकर, मोहन गुरव, तात्यासो वलेकर, जगन्नाथ वलेकर, हे सर्व कार्यकर्ते यांच्या समवेत संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, या योजनेतील बंद झालेल्या पेन्शनी त्वरित चालू करण्यात याव्यात व 2013 सालच्या जीआर प्रमाणे पेन्शनी चालू कराव्यात व लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे पेन्शन चालू व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा