वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार
सांगोला प्रतिनिधी:
वाढेगाव येथे आज झालेल्या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड आणि उस्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. रस्ते, चौक आणि परिसरात घोषणाबाजी व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा रंगली.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली. “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश देत समर्थकांनी एकजूट दाखवली. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना मा. अतुल (मालक) पवार यांनी विरोधकांवर टीका करत विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले, “दादांनी आयुष्य जनतेसाठी दिलं. वाढेगावला आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष काम हवं आहे. घड्याळ चिन्ह हे विश्वास आणि सातत्यपूर्ण कामाचं प्रतीक आहे. जनतेचा कौल काम करणाऱ्यांच्या बाजूनेच लागेल.”
तसेच श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात विकासाचा मुद्दा पुढे करत समर्थकांना आवाहन केले. “वाढेगावच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जनतेने अनुभवातून योग्य-अयोग्य ओळखलं आहे. घड्याळ चिन्हावर ठसा उमटवून विकासाच्या बाजूने उभे राहा,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात मा.अतुल (मालक) पवार , शिवसेना शिंदे गट युवा नेते मा. सागर पाटील, नूतन नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने. नगरसेवक मा. काशिलिंग गावडे नगरसेवक मा.माऊली तेली, भाजपा उमेदवार सो भारती लालासाहेब देशमुख, शिवसेना उमेदवार सौ. राणी गजानन उबाळे
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार शुभारंभानंतर गावात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा